शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

तीव्र पाणीटंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:15 IST

मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली.

ठळक मुद्देचामोर्शी तालुका : जलपातळी घटल्याने नळ योजनांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली. याचा परिणाम आता दिसून येत आहे. तालुक्यातील नदी काठालगतच्या अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण व्हायची. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच लहान नाले, तलाव आटायला सुरूवात झाली. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीतील जलपातळी झपाट्याने घटत आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील पाच ते सहा गावांना पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चामोर्शी जवळील चिचडोह बॅरेज बांधून पाणी अडविण्यात आल्यामुळे बॅरेजच्या उतार भागात असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनांना मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी शक्यता दिसून येत नाही. आतापासूनच या नळ योजनांची जलपातही अतिशय खाली गेली आहे. भेंडाळा, वाघोलीसह परिसरातील तीन ते चार गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया नळ योजनांच्या विहिरीतील जलपातळी खाली गेल्याने गावात केल्या जाणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुन्हा उन्हाळ्याची दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे अशा स्थितीत या भागात पाणीटंचाई तीव्र होईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बॅरेजच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाणी शिल्लक नाही. परिणामी या भागातील नळ योजनांद्वारे एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करावा लागत आहे.विशेष म्हणजे गावातील अनेक विहिरी व हातपंपाची पातळी अत्यंत खाली गेली आहे. यातील पाणीपातळी पुन्हा खाली गेल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या भागातील भाजीपाला तसेच उन्हाळी धानपिकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे नव्यानेच निर्माण झालेल्या चिचडोह बॅरेजमधील पाणी कडक उन्हाळ्यात नदीच्या उतार भागात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई