शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

नुकसानग्रस्त सात हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून प्रशासनाने अहवाल तयार केला. त्यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ते मदतीस पात्र ठरले.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : १८ हजार ७१९ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. २० डिसेंबरपर्यंत १८ हजार ७१९ शेतकऱ्यांना ९ कोटी ८२ लाख ४३ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. अजुनही ७ हजार २२० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले.नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून प्रशासनाने अहवाल तयार केला. त्यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ते मदतीस पात्र ठरले. त्यासाठी १२ कोटी ४९ लाख १९ हजार २३८ रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता होती. शासनाने पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार तर दुसºया टप्यात ७ कोटी ४४ लाख ११ हजार असा एकूण १० कोटी ८४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तो वितरित करण्याच्या कामाला सुरूवात झाली. २० डिसेंबरपर्यंत १८ हजार ७१९ शेतकऱ्यांना ९ कोटी ८२ लाख ४३ हजार २३९ रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे. हे प्रमाण ९०.५७ टक्के एवढे आहेत. उर्वरित अनुदान वितरणाचे काम सुरू आहे. उर्वरित अनुदान शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.शासनाकडून पावणेदोन कोटी अप्राप्तनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी १२ कोटी ४९ लाख १९ हजार २३८ रुपयांच्या अनुदानाची गरज होती. त्यापैकी शासनाकडून दोन टप्प्यात १० कोटी ८४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. अजुनही १ कोटी ६४ लाख ४१ हजार २३८ रुपये अनुदानाची गरज आहे. शासनाकडून सदर निधी उपलब्ध झाला नसल्याने काही शेतकऱ्यांना वेटींगवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतरच वितरणाला सुरूवात होईल. शासनाने सदर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी