शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.

ठळक मुद्देप्रचार-प्रसार थंडावला : असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू केली. शासनाच्या दबावामुळे सुरूवातीला या योजनेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेत सहभागी झाले. त्यानंतर मात्र शासन व प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने आता या योजनेचा विस्तार कमी झाला आहे. जिल्हाभरातील केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे.खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वार्षिक ४२ रुपये ते १४५४ रुपये असा लाभार्थीच्या वयानुसार हप्ता ठरतो.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र शासनाचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बराच दबाव होता. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बँकेचे कर्मचारी योजनेविषयी माहिती देत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सुध्दा योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कामाला लागले होते. २०१५ नंतर भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले. अटल पेन्शनकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत आहेत. मागील चार वर्षाच्या कालावधीत या योजनेचा लाभ केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी घेतला आहे.योजनेच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचे दिसून येते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. मात्र योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.योजनेची वैशिष्ट्येया योजनेंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक हप्ता केवळ ४२ रुपये ते १४५४ रुपये एवढा भरायचा आहे. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. वयानुसार हप्त्याची रक्कम बदलते. जेवढे वय अधिक तेवढी हप्त्याची रक्कम अधिक राहते. लाभार्थ्याला ६० वर्ष वयानंतर मासिक एक हजार रुपये ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रुपये दिले जातील.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन