शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.

ठळक मुद्देप्रचार-प्रसार थंडावला : असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू केली. शासनाच्या दबावामुळे सुरूवातीला या योजनेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेत सहभागी झाले. त्यानंतर मात्र शासन व प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने आता या योजनेचा विस्तार कमी झाला आहे. जिल्हाभरातील केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे.खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वार्षिक ४२ रुपये ते १४५४ रुपये असा लाभार्थीच्या वयानुसार हप्ता ठरतो.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र शासनाचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बराच दबाव होता. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बँकेचे कर्मचारी योजनेविषयी माहिती देत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सुध्दा योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कामाला लागले होते. २०१५ नंतर भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले. अटल पेन्शनकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत आहेत. मागील चार वर्षाच्या कालावधीत या योजनेचा लाभ केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी घेतला आहे.योजनेच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचे दिसून येते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. मात्र योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.योजनेची वैशिष्ट्येया योजनेंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक हप्ता केवळ ४२ रुपये ते १४५४ रुपये एवढा भरायचा आहे. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. वयानुसार हप्त्याची रक्कम बदलते. जेवढे वय अधिक तेवढी हप्त्याची रक्कम अधिक राहते. लाभार्थ्याला ६० वर्ष वयानंतर मासिक एक हजार रुपये ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रुपये दिले जातील.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन