शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘त्या’ २२ जणांची झाली गुप्त सभा

By admin | Updated: May 5, 2016 00:08 IST

१५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ट्रॅक्टर अपघात प्रकरण : तडजोडीसाठी रकमेची केली मागणीदेसाईगंज : १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणातील खऱ्या रहस्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाली असल्याने पोलीस आपल्याला कधीही अटक करू शकतात, त्यामुळे पोलिसांशी तडजोड करण्यासाठी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी प्रत्येकाकडून सात हजार रूपये वसूल करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. शिवाय या बैठकीच्या चर्चेबाबत कुठे वाच्चता केल्यास बघून घेण्याची धमकीसुद्धा मुख्य सूत्रधाराने बैठकीत २१ जणांना दिली.सदर ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी यातील २१ जणांनापैकी एकाने जरी गडबड केल्यास व मला अटक झाल्यास सर्वांनाच या प्रकरणात पोलिसांमार्फत अडकविणार, अशी तंबी मुख्य सूत्रधाराने सभेत सर्वांना दिली. १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये एकूण २२ जण बसले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. यापैकी ३ मे रोजी चार जणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केल्याची माहिती आहे. १५ एप्रिल रोजी ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात उमाकांत बांबोळे व विजय आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला, असे भासविण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तळाशी जाऊन तपास न करता मृतदेहाचे शव विच्छेदन केले. त्यानंतर चोप, कोरेगाव, शंकरपूर परिसरात वेगळीच चर्चा सुरू झाली. अपघातानंतर उमाकांत बांबोळे याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मागे बसलेला विजय आत्राम गंभीर जखमी झाला. दरम्यान अपघाताची माहिती होऊ नये म्हणून तीन ते चार जणांनी आत्राम याला फावडे, सबल व लाठी काठ्यांनी ठार मारल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मृतक बांबोळेच्या साहित्याच्या रकमेच्या वाटपातून काहींना हिस्सा न मिळाल्याने या प्रकरणातील खरे रहस्य पुढे येत असल्याचे दिसते. (वार्ताहर)