शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ अधिसूचना रद्द करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

 हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाने दि. २९ सप्टेंबर २०२१ राेजी काढलेल्या अधिसूचनेमुळे हिवताप विभागात कार्यरत हंगामी फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे आराेग्य सेवक बनण्याचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी सदर कर्मचारी संघर्ष करीत आहेत.  हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.  जिल्ह्यात राज्यातील ७५ टक्के मलेरियाचा प्रादुर्भाव असूनही नियमित ऑर्डर निघत नाहीत.  २०१६ साली नियुक्त केलेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचे ९० दिवस काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मग १८० दिवस पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील अनेक क्षेत्र कर्मचारी आराेग्य सेवकाच्या पदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र ती अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

 बारावी विज्ञान पासची जाचक अट -    बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट ‘क’ चा फार्म भरण्यासाठी आत्ता बारावी सायन्स पासची अट लागू झालेली आहे. आर्ट फॅकल्टी च्या बहुतांश मुलांसाठी वेळेवर बारावी सायन्स ही अट पूर्ण करणे अशक्य आहे.  त्याशिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा अनिवार्य करण्यात आला आहे. बहुतांश मुलांना सायन्स नसल्यामुळे ते करणे सुद्धा अशक्य आहे. म्हणून ५० टक्के राखीव कोटा पूर्ववत करून, बारावी पास कोणत्याही शाखेतून करावे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास डिप्लोमा ही अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आलेली आहे.-    मुंबई येथे आंदाेलन केल्यानंतर कर्मचारी गडचिराेली येथे पाेहाेचले. गडचिराेली येथील पत्रकार भवनात सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेत यापुढे लढा कसा द्यायचा, याचे नियाेजन करण्यात आले. सभेला जिल्हाभरातील क्षेत्र कर्मचारी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना