शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

‘ती’ अधिसूचना रद्द करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

 हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाने दि. २९ सप्टेंबर २०२१ राेजी काढलेल्या अधिसूचनेमुळे हिवताप विभागात कार्यरत हंगामी फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे आराेग्य सेवक बनण्याचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी सदर कर्मचारी संघर्ष करीत आहेत.  हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.  जिल्ह्यात राज्यातील ७५ टक्के मलेरियाचा प्रादुर्भाव असूनही नियमित ऑर्डर निघत नाहीत.  २०१६ साली नियुक्त केलेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचे ९० दिवस काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मग १८० दिवस पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील अनेक क्षेत्र कर्मचारी आराेग्य सेवकाच्या पदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र ती अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

 बारावी विज्ञान पासची जाचक अट -    बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट ‘क’ चा फार्म भरण्यासाठी आत्ता बारावी सायन्स पासची अट लागू झालेली आहे. आर्ट फॅकल्टी च्या बहुतांश मुलांसाठी वेळेवर बारावी सायन्स ही अट पूर्ण करणे अशक्य आहे.  त्याशिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा अनिवार्य करण्यात आला आहे. बहुतांश मुलांना सायन्स नसल्यामुळे ते करणे सुद्धा अशक्य आहे. म्हणून ५० टक्के राखीव कोटा पूर्ववत करून, बारावी पास कोणत्याही शाखेतून करावे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास डिप्लोमा ही अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आलेली आहे.-    मुंबई येथे आंदाेलन केल्यानंतर कर्मचारी गडचिराेली येथे पाेहाेचले. गडचिराेली येथील पत्रकार भवनात सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेत यापुढे लढा कसा द्यायचा, याचे नियाेजन करण्यात आले. सभेला जिल्हाभरातील क्षेत्र कर्मचारी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना