शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन दिवस शाळा व खासगी आस्थापना राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत. मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले-   नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे. -    अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच  सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

१५ दिवसात पाच जणांचा पुरामुळे बळी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा येथील राजकुमार एकनाथ राउत हा ४ जुलै राेजी काेलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला असता ताे वाहून गेला. अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावर जितेंद्र दाेडके हा वीज कर्मचारी ९ जुलै राेजी वाहून गेला. १० जुलैच्या रात्री याच पेरमिली नाल्यावर एक ट्रक वाहून गेला. या ट्रकमध्ये अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथील सीताराम बिच्छु तलांडे, सम्मी सीताराम तलांडे, भामरागड तालुक्यातील माेकाेला येथील पुष्पा नामदेव गावडे ही १४ वर्षाच्या मुलीचे मृतदेह आढळले.

भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार साेमवार ते बुधवारपर्यंत वज्राघात, अतिवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी काेणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. नदी नाल्याजवळ सेल्फी काढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. - संजय मीना, जिल्हाधिकारी, गडचिराेली

प्रशासन अलर्टपुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेउन प्रशासन अलर्ट झाले आहे. मुख्यालयी राहण्याच्या सूचना सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी दाेन्ही बाजुला पाेलीस तैनात केले जातील.

या धरणांचे पाणी साेडले वैनगंगा नदीचे मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ५ दरवाजे, चिचडाेह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले आहेत.वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच १३ दरवाजे उघडले आहेत. निम्म वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ७ दरवाजे उघडले आहेत.गाेदावरील नदीवरील मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ६५ दरवाजे  उघडले  आहेत.भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकाेटा, पामुलगाैतम या नद्यासुद्धा ओसांडून वाहत आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी