शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तीन दिवस शाळा व खासगी आस्थापना राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत. मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले-   नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे. -    अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच  सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

१५ दिवसात पाच जणांचा पुरामुळे बळी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा येथील राजकुमार एकनाथ राउत हा ४ जुलै राेजी काेलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला असता ताे वाहून गेला. अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावर जितेंद्र दाेडके हा वीज कर्मचारी ९ जुलै राेजी वाहून गेला. १० जुलैच्या रात्री याच पेरमिली नाल्यावर एक ट्रक वाहून गेला. या ट्रकमध्ये अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथील सीताराम बिच्छु तलांडे, सम्मी सीताराम तलांडे, भामरागड तालुक्यातील माेकाेला येथील पुष्पा नामदेव गावडे ही १४ वर्षाच्या मुलीचे मृतदेह आढळले.

भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार साेमवार ते बुधवारपर्यंत वज्राघात, अतिवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी काेणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. नदी नाल्याजवळ सेल्फी काढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. - संजय मीना, जिल्हाधिकारी, गडचिराेली

प्रशासन अलर्टपुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेउन प्रशासन अलर्ट झाले आहे. मुख्यालयी राहण्याच्या सूचना सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी दाेन्ही बाजुला पाेलीस तैनात केले जातील.

या धरणांचे पाणी साेडले वैनगंगा नदीचे मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ५ दरवाजे, चिचडाेह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले आहेत.वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच १३ दरवाजे उघडले आहेत. निम्म वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ७ दरवाजे उघडले आहेत.गाेदावरील नदीवरील मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ६५ दरवाजे  उघडले  आहेत.भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकाेटा, पामुलगाैतम या नद्यासुद्धा ओसांडून वाहत आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी