शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

अनियमित बसफेऱ्यांचा शालेय विद्यार्थिनींना फटका

By admin | Updated: January 13, 2017 00:45 IST

तालुक्यात एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोठा फटका बसत आहे.

कुरखेडा : तालुक्यात एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोठा फटका बसत आहे. अनेकवेळा बस वेळेत न येत असल्याने बसस्थानक परिसरात तासन्तास उपाशी या विद्यार्थिनींना थांबावे लागत आहे. तालुका मुख्यालयात तब्बल १२०० विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मालेवाडा परिसरातील धनेगाव, येंगलखेडा, शिवणी, महाजनटोला, चिचटोला येथील सकाळपाळीतील विद्यार्थी सकाळी ७ वाजता मालेवाडा-गडचिरोली बसने कुरखेडा येथे येतात. त्यांची शाळेची सुटी ११ ते ११.३० दरम्यान होते. त्यांना परतीकरिता गडचिरोली-मालेवाडा ही १२.१५ ची बसफेरी आहे. मात्र सदर फेरी कधीच वेळेवर येत नाही. अनेकदा ती रद्द सुध्दा करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावरच दुपारी ३ वाजेपर्यंत दुसऱ्या बसफेरीची वाट पाहत उपाशी थांबावे लागते. तसेच रामगड, पुराडा, अंतरगाव, भटेगाव, कुंभीटोला, हेटीनगर, परिसरातील दुपारपाळीतले विद्यार्थी सायंकाळी परतीचा प्रवास गडचिरोली-कोटगुल या बसफेरीने करतात. ही बस कुरखेडावरून सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत जाते. मात्र ही बसफेरी सुध्दा अनेकदा अनियमित आहे. या मार्गावरील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारला सुध्दा अचानक ही बसफेरी रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील गावांमधील ३५ ते ४० विद्यार्थी रात्री ७.३० वाजेपर्यंत येथे अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच कुरखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे यांनी गडचिरोलीचे बसस्थानक प्रमुख राठोड तसेच आगार व्यवस्थापक बावणे यांना संपर्क केला व तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर कुरखेडा येथील मुक्कामी असलेली अंतरगाव बसफेरीने या मुलांना त्यांच्या गावी सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)