शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

शालेय पोषण आहाराला दांडी

By admin | Updated: July 7, 2015 01:28 IST

२६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

धान्य पुरवठ्याचा अभाव : अनेक शाळेत आहार शिजलाच नाहीआष्टी : २६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बऱ्याच शाळांमध्ये शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये शालेय पोषण आहाराला दांडी मारली जात असल्याचे चित्र आहे. बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार शिजलाच नसल्यामुळे विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत. परिणामी शासनाच्या मध्यान्ह पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. शासन व प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जूनला नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यासाठी अनेक गावांत रॅली काढण्यात आली. यात लोकप्रतिनिधींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक सहभागी झाले. मात्र शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शासन व प्रशासनाने कुठलीही व्यवस्था केली नाही. परिणामी अनेक शाळेमध्ये शालेय पोषण आहाराकरिता धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे दोन आठवड्यात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. जिल्ह्याच्या काही जि. प. शाळांमधील मुख्याध्यापकांनी मागील वर्षीचा शिल्लक उरलेला काही धान्यसाठा व्यवस्थित राखून ठेवला. अशा मोजक्याच शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, विद्यार्थी शाळेत नियमित यावे, यासाठी शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली. मात्र प्रभावी अंमलबजावणी नाही. (प्रतिनिधी)अहेरी, चामोर्शी तालुक्यात धान्य पुरवठा नाहीअहेरी व चामोर्शी तालुक्यात अद्यापही शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी व कोनसरी केंद्रांतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात न आल्याने या शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजला नसल्याची माहिती आहे. आष्टी केंद्रात केवळ मार्र्कं डा (कं.) व एका खासगी शाळेत आहारासाठी धान्याचा पुरवठा झाला आहे. मात्र या केंद्रातील १३ शाळांमध्ये धान्य पुरवठा न झाल्याने विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत.चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत कोनसरी केंद्रातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील वर्षीचा पोषण आहाराचा धान्यपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये नियमित पोषण आहार दिला जात असल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी दिली आहे. मात्र यंदाच्या २०१५-१६ च्या सत्रात अद्यापही कोनसरी केंद्रातील शाळांना पोषण आहाराकरिता धान्य पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करणे सुरू झाले आहे. चामोर्शी पं. स. अंतर्गत चार केंद्रावर तेथील शाळांकरिता धान्य पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित केंद्रांमध्ये लवकरच धान्य पुरवठा होईल.- एस. जी. परदेशी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चामोर्शी