शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मोहटोल्यात वनहक्क पट्ट्याची जमीन विकण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला पुनर्वसित किन्हाळा गावालगत अनेक जण वनजमिनीवर अतिक्रमण करून सदर जागा शेतीसाठी वापरत असल्याने शासकीय स्तरावरून अतिक्रमणधारकांना ...

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला पुनर्वसित किन्हाळा गावालगत अनेक जण वनजमिनीवर अतिक्रमण करून सदर जागा शेतीसाठी वापरत असल्याने शासकीय स्तरावरून अतिक्रमणधारकांना वनजमिनीचे पट्टे देण्यात आले. वनजमिनीचे पट्टे देताना तिचा उपयाेग उपजीविकेसाठी व्हावा, हा उद्देश शासनाचा आहे. व्यवसायासाठी अथवा इतर कारणांसाठी सदर जमिनीची विक्री करता येणार नाही, ही अट ठेवून अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे देण्यात आले. मात्र, येथील काही शेतकऱ्यांनी मुख्य मार्गांलगतच्या शेतजमिनीला जादा दर मिळू लागल्याने शासन नियमाला हरताळ फासून मोठ्या प्रमाणात संपूर्ण शेतजमिनी विक्री करून लाखो रुपये कमविले, तर काहींनी आता हा धंदा सुरू केला आहे. अरततोंडी व किन्हाळा ही गावे पुनर्वसित आहेत. दाेन्ही गावांचे पुनर्वसन करताना अनेकांना देण्यात आलेले वनजमिनीचे पट्टे शासन जमा करण्यात आले होते; परंतु पुनर्वसित अरततोंडी हे संपूर्ण गाव पुनर्वसित ठिकाणी न आल्याने ती शेतजमीन मूळ मालकाला ठलवा करून त्या प्लाॅटची फक्त मालकी देण्यात आली, तर याउलट ज्या पट्टेधारकांची शेतजमीन मुख्य मार्गाला लागून आहे, अशांनी शासन नियमाला हरताळ फासून मोठ्या रकमेच्या बदल्यात शेतजमिनी परस्पर विकल्या. एकीकडे वनजमिनीवर अतिक्रमण करून सदर जागा शेती प्रयोजनार्थ वापरत असल्याने उपजीविकेसाठी सदर जागेचे पट्टे शासनाने दिले; परंतु नियमांचे उल्लंघन करून वनहक्काच्या जागेची व्यवसायासाठी, तसेच इतर कामांसाठी विक्री केली जात आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून विक्री केलेल्या वनहक्क पट्ट्याच्या जागा शासनाने जमा कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

गाळ्यांसह संरक्षक भिंतीचेही बांधकाम

शासनाकडून मिळालेल्या वनहक्क पट्ट्याच्या जागेवर काही लोकांनी व्यवसाय प्रयोजनार्थ गाळे बांधकामही केले आहे, तर काहींनी सदर जागेभोवती संरक्षक भिंत बांधून तेथे मुरमाचा भरणा करून मुख्य मार्गाच्या बरोबरीत उंची वाढविली आहे. ही जागा व्यवसाय करण्यासाठी विक्री केली जाणार असल्याची चर्चा आहे. वनहक्काद्वारे प्राप्त जागेवर अतिक्रमणधारकाचा मालकीहक्क नसताे. सातबारावर ‘सरकार’ असा उल्लेख असताे. त्यामुळे वनहक्काच्या जागेचा वापर केवळ शेती कसून उपजीविकेसाठी करता येताे.