शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वीज दुरुस्तीच्या नावाखाली पावणेतेरा लाखांचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:54 IST

नऊ अधिकाऱ्यांवर कारवाई : एजन्सी मात्र मोकळ्याच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नावाखाली वीज दुरुस्तीच्या महावितरणमधील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार कंपन्यांना हाताशी धरून तब्बल पावणेतेरा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे मागविलेल्या तपशिलातून उघड झाली. या प्रकरणात तब्बल नऊ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे. मात्र, कंत्राटदार एजन्सी मोकळ्याच असल्याने ही कारवाई संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

महावितरणच्या गडचिरोली मंडळअंतर्गत असलेल्या चामोर्शी, आलापल्ली, एटापल्ली, गडचिरोली, सिरोंचा, तसेच चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी उपविभागांमध्ये विविध योजनांमध्ये दुरुस्ती, तसेच नवीन वीज जोडणी कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार २६ डिसेंबर २०२३ रोजी प्रादेशिक संचालकांकडे करण्यात आली होती. महात्मा फुले समता परिषदेचे चामोर्शी येथील अध्यक्ष राजेश्वर बुरांडे, राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे मनोहर चलाख, समता परिषदेचे सचिव अरुण दुधबावरे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष महनोर शेट्टे, ज्येष्ठ नागरिक रवींद्रसिंह चव्हाण यांनी केलेल्या या तक्रारीनंतर त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. 

चौकशी अहवालात काय ?चंद्रपूर परिमंडळाचे व्यवस्थापक एस. यू. जीवने, बल्लारशाहचे उपकार्यकारी अभियंता एस. एस. कापसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. पी. चांभारे यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली. ११ पानी अहवालात १२ लाख ७८ हजारी ३२४ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदार एजन्सीने दाखविलेले साहित्य प्रत्यक्ष चौकशीत गायब असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार राजेश्वर बुरांडे यांनी मार्च २०२५ मध्ये माहिती अधिकार अर्ज केला. त्यानंतर महावितरणने दिलेल्या माहितीमध्ये नऊ अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली आहे.

आता वसुलीचे काय ?

  • या प्रकरणात महावितरणने चौकशीसाठी तत्परता दाखविली नाही. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यास वाव मिळाला. शिवाय पावणे तेरा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले, पण या पैशांची वसुली कोणाकडून करणार, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही.
  • अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले, पण त्यांची नावे उघड केली नाही. शिवाय साहित्य पुरवठा व दुरुस्ती कामे करणाऱ्या एजन्सीजना मात्र मोकळे सोडण्यात आले, असे तक्रारदार राजेश्वर बुरांडे यांनी सांगितले. यातून घोटाळेबाजांची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली