शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

रक्ताचे दातृत्व जपणारे संत निरंकारी मंडळ

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे म्हणतात. हे १०० टक्के सत्यात उतरविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील निरंकारी मंडळाने केले आहे.

दरवर्षी ५५० बॅग रक्त : १९८४ पासून उपक्रमदिगांबर जवादे गडचिरोली‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे म्हणतात. हे १०० टक्के सत्यात उतरविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील निरंकारी मंडळाने केले आहे. १९८४ पासून संत निरंकारी मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करीत आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिरातून जवळपास ५५० बॅग रक्त जिल्हा रूग्णालयाला पुरविण्याचे काम संत निरंकारी मंडळाने अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. आधुनिक युगात मंदिर व धार्मिक ठिकाणांबाबत दातृत्व जपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक मंदिराच्या तिजोऱ्या पैशाच्या ढिगाने भरून गेल्याचे आपण वेळोवेळी वाचत असतो. गोरगरीबांना साधी पाच-पन्नास रूपयांची रक्कमही दान केली तरी प्रसिध्दी करणारे अनेक लोक आज समाजात दिसतात. मात्र मानवी जीवनाला ज्या रक्ताची गरज आहे. ती भागविणारे हात आज कमी झाले आहेत. अनेक प्रकाराने जनजागृती करूनही रक्तदान करण्यासाठी कुणी सरसावत नाही. गडचिरोली या मागास जिल्ह्यात रक्ताची टंचाई वर्षभर जाणवते. अनेकदा रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयाला व जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांना वर्षाला ५५० बॅग रक्त पुरवठ्याची जबाबदारी सत निरंकारी मंडळाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. नुसती जबाबदारी घेऊनच हे थांबलेले नाहीत. तर वर्षातून एकदा रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या संख्येने रक्तदात्यांकडून रक्त जमा करून ते रूग्णालयामार्फत रूग्णांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकर्म हे मंडळ १९८४ पासून करीत आहे. अद्यापही यांचा रक्तदानाचा हा महायज्ञ थांबलेला नाही, हे विशेष.अशी मिळाली प्रेरणा!संत निरंकारी मंडळाचे सद्गुरू गुरूबच्चनसिंग महाराज यांची २४ एप्रिल १९८४ रोजी हत्या करण्यात आली. या हत्येच्या विरोधात या मंडळाचे अनुयायी पेटून उठले. त्यांची समज घालताना गुरूबच्चनसिंग यांचे सुपूत्र हरदेवसिंग महाराज यांनी रक्ताचे पाट रस्त्यावर वाहण्यापेक्षा रक्तदान करून दुसऱ्यांचे जीव वाचवा, असा संदेश दिला. तेव्हापासून २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिन’ म्हणून पाळला जातो. यादिवशी देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या मार्फतीने केले जाते. याशिवाय इतरही दिवशी रक्तदान केले जाते. या मंडळात निरंकारी मंडळाचे अनुयायी रक्तदान करतातच. त्याचबरोबर इतरानीही रक्तदान करावे, याबाबत आठ दिवसांपूर्वीपासून जनजागृती केली जाते. यावर्षी देसाईगंज येथील रक्तदान शिबिरात ४३२ बॅग रक्त गोळा करून देण्यात आले. हा आजपर्यंतचा विक्रमी आकडा आहे. देसाईगंजबरोबरच कुरखेडा, गडचिरोली, अहेरी व ग्रामीण भागातही रक्तदान शिबिराचे आयोजन निरंकारी मंडळ करीत असते. हे सर्व करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक आसाराम निरंकारी, क्षेत्रीय संचालक हरिषकुमार निरंकारी, कुरखेडाचे मुखी माधवदास निरंकारी, गडचिरोलीचे मुखी तुंकलवार, मंडळाचे स्वयंसेवक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्यासह इतर अनुयायी सहकार्य करतात.