शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ठळक मुद्देनिष्क्रियता भोवण्याची शक्यता : मतदारांना गृहित धरल्यामुळे वाढली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे. परंपरागत मतदारांना गृहित धरून त्यांच्या नेत्यांनाही डावलले जात असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका डॉ.उसेंडी यांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. ५ वर्षाच्या आमदारकीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी यांना दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या आमदारकीच्या काळात गडचिरोलीला मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय, कृषी महाविद्यालय ही त्यांची नाही तर तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांची देण असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना नाकारले होते. आता पुन्हा ते आपले नशिब आजमावत आहेत. मात्र मतदारांना आपल्या बाजुने करण्यात ते कमी पडत आहेत.सिरोंचा ते सालेकसा अशा ५०० किलोमीटरच्या या मतदार संघात त्या-त्या भागात प्रभाव असणारे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र आपल्याला विश्वासातच घेतले जात नाही, असे खासगीत बोलून अनेक पदाधिकारी उसेंडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नाही तर गठ्ठा मते असणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांमध्येही डॉ.उसेंडी यांच्या भूमिकेमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यांना योग्य तो मान देण्याऐवजी गृहित धरले जात असल्यामुळे हे नेते कामाला लागलेले नाहीत. त्यांची नाराजी उसेंडी यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दक्षिण गडचिरोली भागात काँग्रेसची मदार बऱ्याच अंशी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आहे. ते काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही घेत आहेत. पण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचेच नेते प्रचारातून गायब आहेत. आधीच गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव, त्यात नेत्यांना सोबत घेण्याचे कसब दिसत नसल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार पद्धती पाहिल्यास भाजपचा प्रचार नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचे दिसते, तर काँग्रेसच्या प्रचारात बºयाच अंशी ताळमेळ नाही. कार्यकर्त्यांवर योग्य ते नियंत्रण नसल्यामुळे ते भरकटत आहेत. त्यांना दैनंदिन सोयीसुविधा देतानाही हात आखडता घेतला जात असल्यामुळे कार्यकर्ते मन लावून काम करायला तयार नाहीत.हीच स्थिती राहिल्यास उसेंडी यांना याही वेळी फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.वंचित बहुजन आघाडी बिघडवणार गणितमागासवर्गीय समाजाला भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष नेहमीच जवळचा वाटत आला आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे आरक्षण घटविण्याचा निर्णय आधी काँग्रेसच्याच काळात झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर ओबीसी समाजाची नाराजी आहे. भाजपच्या काळात हे आरक्षण पुन्हा घटले. ते पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने अशोक नेते यांनी केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार बहुजन आघाडीकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस