शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ठळक मुद्देनिष्क्रियता भोवण्याची शक्यता : मतदारांना गृहित धरल्यामुळे वाढली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे. परंपरागत मतदारांना गृहित धरून त्यांच्या नेत्यांनाही डावलले जात असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका डॉ.उसेंडी यांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. ५ वर्षाच्या आमदारकीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी यांना दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या आमदारकीच्या काळात गडचिरोलीला मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय, कृषी महाविद्यालय ही त्यांची नाही तर तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांची देण असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना नाकारले होते. आता पुन्हा ते आपले नशिब आजमावत आहेत. मात्र मतदारांना आपल्या बाजुने करण्यात ते कमी पडत आहेत.सिरोंचा ते सालेकसा अशा ५०० किलोमीटरच्या या मतदार संघात त्या-त्या भागात प्रभाव असणारे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र आपल्याला विश्वासातच घेतले जात नाही, असे खासगीत बोलून अनेक पदाधिकारी उसेंडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नाही तर गठ्ठा मते असणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांमध्येही डॉ.उसेंडी यांच्या भूमिकेमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यांना योग्य तो मान देण्याऐवजी गृहित धरले जात असल्यामुळे हे नेते कामाला लागलेले नाहीत. त्यांची नाराजी उसेंडी यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दक्षिण गडचिरोली भागात काँग्रेसची मदार बऱ्याच अंशी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आहे. ते काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही घेत आहेत. पण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचेच नेते प्रचारातून गायब आहेत. आधीच गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव, त्यात नेत्यांना सोबत घेण्याचे कसब दिसत नसल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार पद्धती पाहिल्यास भाजपचा प्रचार नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचे दिसते, तर काँग्रेसच्या प्रचारात बºयाच अंशी ताळमेळ नाही. कार्यकर्त्यांवर योग्य ते नियंत्रण नसल्यामुळे ते भरकटत आहेत. त्यांना दैनंदिन सोयीसुविधा देतानाही हात आखडता घेतला जात असल्यामुळे कार्यकर्ते मन लावून काम करायला तयार नाहीत.हीच स्थिती राहिल्यास उसेंडी यांना याही वेळी फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.वंचित बहुजन आघाडी बिघडवणार गणितमागासवर्गीय समाजाला भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष नेहमीच जवळचा वाटत आला आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे आरक्षण घटविण्याचा निर्णय आधी काँग्रेसच्याच काळात झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर ओबीसी समाजाची नाराजी आहे. भाजपच्या काळात हे आरक्षण पुन्हा घटले. ते पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने अशोक नेते यांनी केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार बहुजन आघाडीकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस