शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ठळक मुद्देनिष्क्रियता भोवण्याची शक्यता : मतदारांना गृहित धरल्यामुळे वाढली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे. परंपरागत मतदारांना गृहित धरून त्यांच्या नेत्यांनाही डावलले जात असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका डॉ.उसेंडी यांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. ५ वर्षाच्या आमदारकीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी यांना दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या आमदारकीच्या काळात गडचिरोलीला मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय, कृषी महाविद्यालय ही त्यांची नाही तर तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांची देण असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना नाकारले होते. आता पुन्हा ते आपले नशिब आजमावत आहेत. मात्र मतदारांना आपल्या बाजुने करण्यात ते कमी पडत आहेत.सिरोंचा ते सालेकसा अशा ५०० किलोमीटरच्या या मतदार संघात त्या-त्या भागात प्रभाव असणारे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र आपल्याला विश्वासातच घेतले जात नाही, असे खासगीत बोलून अनेक पदाधिकारी उसेंडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नाही तर गठ्ठा मते असणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांमध्येही डॉ.उसेंडी यांच्या भूमिकेमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यांना योग्य तो मान देण्याऐवजी गृहित धरले जात असल्यामुळे हे नेते कामाला लागलेले नाहीत. त्यांची नाराजी उसेंडी यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दक्षिण गडचिरोली भागात काँग्रेसची मदार बऱ्याच अंशी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आहे. ते काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही घेत आहेत. पण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचेच नेते प्रचारातून गायब आहेत. आधीच गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव, त्यात नेत्यांना सोबत घेण्याचे कसब दिसत नसल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार पद्धती पाहिल्यास भाजपचा प्रचार नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचे दिसते, तर काँग्रेसच्या प्रचारात बºयाच अंशी ताळमेळ नाही. कार्यकर्त्यांवर योग्य ते नियंत्रण नसल्यामुळे ते भरकटत आहेत. त्यांना दैनंदिन सोयीसुविधा देतानाही हात आखडता घेतला जात असल्यामुळे कार्यकर्ते मन लावून काम करायला तयार नाहीत.हीच स्थिती राहिल्यास उसेंडी यांना याही वेळी फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.वंचित बहुजन आघाडी बिघडवणार गणितमागासवर्गीय समाजाला भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष नेहमीच जवळचा वाटत आला आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे आरक्षण घटविण्याचा निर्णय आधी काँग्रेसच्याच काळात झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर ओबीसी समाजाची नाराजी आहे. भाजपच्या काळात हे आरक्षण पुन्हा घटले. ते पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने अशोक नेते यांनी केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार बहुजन आघाडीकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस