शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

रबीत ५१ लाखांचे कर्ज वितरित

By admin | Updated: December 23, 2016 00:56 IST

शेतकऱ्यांकडे पाणीपंप, विहीर यांची सोय झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता रबी पिकाचीही पेरणी करू लागला आहे.

८६ शेतकऱ्यांना लाभ : खरिपाच्या तुलनेत नगन्य गडचिरोली : शेतकऱ्यांकडे पाणीपंप, विहीर यांची सोय झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता रबी पिकाचीही पेरणी करू लागला आहे. चालू रबी हंगामात ३० हजार हेक्टरवर रबीची पेरणी करण्याचे नियोजन होते. त्यापैकी जवळपास २० हजार हेक्टरवर पेरणी झाली असून बँकांकडून ५१ लाख रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. सुमारे सव्वा लाख हेक्टरवर धान पीक घेतले जाते. धान पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. चामोर्शी, सिरोंचा व आरमोरी तालुक्यात काही निवडक शेतकरीच उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. रबी पिकाचे मात्र जिल्हाभरात उत्पादन घेतले जाते. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने सूर्यफूल, चना, लाखोळी, लाख, वाटाणा, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे. काही शेतकरी उन्हाळी तूर पिकाचेही उत्पादन घेतात. चांगली मशागत करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च होतो. यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा राहत नाही. त्याचबरोबर शासन बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते. याचा लाभ शेतकरी उचलतात. चालू रबी हंगामात सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतले आहे. यामध्ये सर्वच कर्ज बँक आॅफ इंडियाने दिले आहे. रबी हंगामामध्ये २ हजार १९९ शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ८६ शेतकऱ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. खरीपाच्या तुलनेत रबीतील कर्ज वितरणाचे प्रमाण कमी आहे. बहुतांश रबी पिकांसाठी फार मोठ्या प्रमाणात लागवड खर्च येत नसल्याने बहुतांश शेतकरी रबीसाठी कर्ज घेत नसल्याचा अनुभव आहे. (नगर प्रतिनिधी) रबीचे क्षेत्र वाढविण्याची गरज बहुतांश शेतकऱ्यांकडे शासनाने अनुदानावर दिलेले पाणीपंप आहे. शासनाने विहीरही खोदून दिली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे जल सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शेतकरी रबी पिकांचे उत्पादन घेत नाही. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास हे शेतकरी सुध्दा रबी पिकांची लागवड करतील. उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. खरिपाच्या तुलनेत कर्ज वितरण कमी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रबी पिकांची पेरणी करतात. मात्र धानाच्या तुलनेत रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना अत्यंत कमी खर्च येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्ज घेत नाही. काही दिवसांपर्यंत सदर कर्ज बिनव्याजी देण्यात येत असले तरी उगाच आपल्या डोक्यावर कर्जाचे बोझा नको, या उद्देशानेही शेतकरी कर्ज घेत नाही. त्याचबरोबर धान पीक निघाला राहत असल्याने शेतकऱ्यांकडे पैसा खेळण्यास सुरूवात होते. त्यामुळे रबी हंगामासाठी येणारा खर्च शेतकरी वर्ग धानाच्या उत्पन्नातून करून घेतात. त्यामुळे रबी हंगामात कर्ज घेण्याचे प्रमाण कमी आहे.