शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
5
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
6
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
7
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
8
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
9
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
10
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
11
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
12
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
13
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
14
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
15
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
16
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
17
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
18
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
19
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
20
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

कर्मचारी बेपत्ता नागरिकांच्या फेर्‍या

By admin | Updated: June 9, 2014 23:37 IST

येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली

देसाईगंज येथील : तालुका भूमी अभिलेख कार्यालयदेसाईगंज : येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली असता केवळ शिपायांच्या भरवशावर कार्यालय सुरू होते. मात्र कार्यालयातील खुच्र्या पंख्यांची हवा खात असताना आढळून आले. नागरिकांवर शुल्लक कामाकरिता १५-१५ दिवस फेर्‍या मारण्याची पाळी येत असल्याचे एका कामासाठी आलेल्या एका ग्रामीण भागातील नागरीकाने लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ ठरविलेली आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांना ही वेळ लागू नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातील एकही दिवशी दुपारी २ वाजण्यापूर्वी येथील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. या कार्यालयाशी गाठ पडणार्‍या नागरिकांना कर्मंचार्‍यांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारला कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयातील १६ कर्मचार्‍यांपैकी २ महिला शिपाई, एक महिला दप्तरबंद व एक पूरूष सर्वेअर असे फक्त ४ कर्मचारी उपस्थित होते. मात्र इतर कर्मचारी अनुपस्थित असतांना देखील काही कर्मचारी दौर्‍यावर तर काही कर्मचारी मोजणीला गेले असल्याचे सांगीतले. येथील उपअधिक्षक केवळ महिण्यातून तीन ते चार दिवसच कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे कामासाठी येणार्‍या नागरिकांचे म्हणणे आहे. मोजणीचे कित्येक प्रकरणे प्रलंबित असताना देखील कर्मचारी कार्यालयात उपस्थित का राहत नाहीत., असा अनेकांना प्रश्न  पडला आहे.  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात १५ टक्के अधिक प्रोत्साहन भत्ता कर्मचार्‍यांना मिळतो. कर्मचारी मोठय़ा खुशीने येथील कार्यालयात बदली करून येण्यास तयार असतात. मात्र कार्यालयाला बुट्टी मारण्याची कोणतीच संधी कर्मचारी सोडत नाहीत. कामचुकारपणाच्या तक्रारी होउनही अधिकारी देखील पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या कार्यालयातील कित्येक कर्मचारी केवळ सही पुरते कार्यालयात येतात. नंतर लगेच दौर्‍यावर जातात. या कार्यालयातील कर्मचार्‍यांना दररोज दौरे असतातच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कार्यालयांचा कारभार असाच सुरू आहे असाही  आरोप होत आहे. (वार्ताहर)