शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बेपत्ता नागरिकांच्या फेर्‍या

By admin | Updated: June 9, 2014 23:37 IST

येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली

देसाईगंज येथील : तालुका भूमी अभिलेख कार्यालयदेसाईगंज : येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली असता केवळ शिपायांच्या भरवशावर कार्यालय सुरू होते. मात्र कार्यालयातील खुच्र्या पंख्यांची हवा खात असताना आढळून आले. नागरिकांवर शुल्लक कामाकरिता १५-१५ दिवस फेर्‍या मारण्याची पाळी येत असल्याचे एका कामासाठी आलेल्या एका ग्रामीण भागातील नागरीकाने लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ ठरविलेली आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांना ही वेळ लागू नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातील एकही दिवशी दुपारी २ वाजण्यापूर्वी येथील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. या कार्यालयाशी गाठ पडणार्‍या नागरिकांना कर्मंचार्‍यांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारला कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयातील १६ कर्मचार्‍यांपैकी २ महिला शिपाई, एक महिला दप्तरबंद व एक पूरूष सर्वेअर असे फक्त ४ कर्मचारी उपस्थित होते. मात्र इतर कर्मचारी अनुपस्थित असतांना देखील काही कर्मचारी दौर्‍यावर तर काही कर्मचारी मोजणीला गेले असल्याचे सांगीतले. येथील उपअधिक्षक केवळ महिण्यातून तीन ते चार दिवसच कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे कामासाठी येणार्‍या नागरिकांचे म्हणणे आहे. मोजणीचे कित्येक प्रकरणे प्रलंबित असताना देखील कर्मचारी कार्यालयात उपस्थित का राहत नाहीत., असा अनेकांना प्रश्न  पडला आहे.  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात १५ टक्के अधिक प्रोत्साहन भत्ता कर्मचार्‍यांना मिळतो. कर्मचारी मोठय़ा खुशीने येथील कार्यालयात बदली करून येण्यास तयार असतात. मात्र कार्यालयाला बुट्टी मारण्याची कोणतीच संधी कर्मचारी सोडत नाहीत. कामचुकारपणाच्या तक्रारी होउनही अधिकारी देखील पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या कार्यालयातील कित्येक कर्मचारी केवळ सही पुरते कार्यालयात येतात. नंतर लगेच दौर्‍यावर जातात. या कार्यालयातील कर्मचार्‍यांना दररोज दौरे असतातच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कार्यालयांचा कारभार असाच सुरू आहे असाही  आरोप होत आहे. (वार्ताहर)