शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्य बनलेल्या आशांबाबत अद्यापही भूमिका अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST

जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक आशा स्वयंसेविकासुद्धा रिंगणात उतरल्या आणि काहींनी यात विजयसुद्धा ...

जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक आशा स्वयंसेविकासुद्धा रिंगणात उतरल्या आणि काहींनी यात विजयसुद्धा मिळविला, परंतु शासकीय धोरणानुसार ग्रामपंचायत सदस्य अथवा अाशा स्वयंसेविका यापैकी एकाच पदावर राहता येत असल्याने त्यांना स्वेच्छेने एक पद सोडणे गरजेचे होते. परंतु निकालानंतर जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटुनही ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या आशा स्वयंसेविकांनी आपली इच्छा प्रशासनासमोर जाहीर न केल्याने गावातील लोक संभ्रमावस्थेत आहेत. अहेरी तालुक्यात एकूण सहा ग्रामपंचायतमध्ये आशा सेविकांनी विजय प्राप्त केला. यात मेडपल्ली व मरपल्ली येथील आशा स्वयंसेविकांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने तिथे आगामी पोटनिवडणूक होणार आहे. तेथे नवीन उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे. परंतु आणखी चार ग्रामपंचायतीत विजयी आशा स्वयंसेविकांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने प्रशासन व गावातील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. ग्रा.पं. सदस्य बनलेल्या आशांनी आपली भूमिका प्रशासनाला कळविली तर गावात पुढील पोटनिवडणूक होईल किंवा नाही याची माहिती प्रशासनाला व जनतेला देता येईल किंवा एखाद्या गरजू महिलेला आशा स्वयंसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळेल, परंतु आरोग्य विभागाने पत्र दिल्यानंतरही आशांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकरण पुन्हा जटील हाेत आहे.

जि.प.

अहेरी तालुक्यातील ४ गावांमध्ये आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणार की स्वयंसेविकाचे पदभार सोडणार याबाबत गावात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र जवळपास दोन महिने उलटूनही जिल्हा प्रशासन याबाबत कोणताही निर्णय देत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्य बनलेल्या आशांनी कुठल्यातरी एका पदाचा राजीनामा दिला असता चित्र स्पष्ट झाले असते. सरपंच निवडणुकीचा निकाल काही ग्रामपंचायतीत वेगळ्या स्वरूपाचा लागला असता, परंतु सरपंच पदाची निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत सदस्य पदावर कायम राहतील की पुन्हा आशा स्वयंसेविकांचा पदभार सांभाळतील याबाबत चर्चा रंगू लागलेली आहे. परंतु या सर्व प्रकरणाकडे आता जिल्हा परिषेदच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.