शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

लॉकडाऊनमध्ये दिला रोहयोने आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग, व्यवसाय, सेवा बंद पडल्या. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला.

ठळक मुद्देआर्थिक परिस्थिती सावरली : एप्रिल महिन्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांना ११ लाख मनुष्यबळ रोजगार उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला होता. या कालावधीत रोजगार हमी योजना कामाला आली. १ एप्रिल ते २१ जून या कालावधीपर्यंत जिल्हाभरात ११ लाख ४ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. यामुळे कोरोनाच्या कालावधीत आर्थिक संकट थोडेफार कमी होण्यास मदत झाली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग, व्यवसाय, सेवा बंद पडल्या. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला. याची झळ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनाही बसली. ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी येणारे नागरिक बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित राज्यांना दिले. त्यानुसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली. खरीप पूर्व हंगामाची कामे सुरू होण्यापूर्वीपर्यंत रोजगार हमी योजनेच्या कामांवर जिल्ह्यातील हजारो मजूर काम करीत होते. १ एप्रिल ते २१ जून या कालावधीत सुमारे ११ लाख ४ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. तेंदूपत्ता संकलन हा जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यवसाय मानल्या जाते. लॉकडाऊनमुळे याही व्यवसायाचे कंबरडे मोडले. अनेक ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलावच झाले नाही. परिणामी तेंदूपत्त्यावरील मजुरही रोजगार हमीच्या कामात व्यस्त झाले.३४९ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगारप्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला रोजगार हमी योजनेंतर्गत वर्षभरात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसतानाही त्या कुटुंबातील सदस्याने रोजगाराची मागणी केल्यास व प्रशासन रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम नसल्यास त्या कुटुंबाला बेरोजगारीभत्ता देण्याची तरतुद आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध होण्यास विशेष महत्त्व आहे.रोजगार हमी योजना ठरताहे वरदानगडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे स्थानिक मजुरांसाठी वरदान ठरत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची मागणी होते.