शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

रोहयो ठरले जांभुळखेडा सिंचन प्रकल्पाला वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:44 IST

जांभुळखेडा लघुसिंचन प्रकल्प मागील ३६ वर्षांपासून रखडले होते. या सिंचन प्रकल्पासाठी रोहयोतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळून लवकरच प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपाळीचे काम पूर्ण : २५ लाखांचा पहिला हप्ता प्राप्त; १२५ हेक्टर जमिनीला मिळणार सिंचनाची सुविधा

सिराज पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जांभुळखेडा लघुसिंचन प्रकल्प मागील ३६ वर्षांपासून रखडले होते. या सिंचन प्रकल्पासाठी रोहयोतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळून लवकरच प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१९८२ च्या वनकायद्याच्या आडकाठीने येंगलखेडा, बामणी, सोनेरांगी व जांभुळखेडा येथील लघुसिंचन प्रकल्पांचे काम अर्धवट राहिले होते. यापैकी येंगलखेडा लघुसिंचन प्रकल्प तत्कालीन आमदार आनंदराव गेडाम यांच्या पाठपुराव्याने पुन्हा सुरू झाला. वनजमिनीचा मोबदला म्हणून कोट्यवधी रूपयांचा निधी वनविभागाला देण्यात आला. सदर प्रकल्पाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते. जांभुळखेडावासीयांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. याची दखल घेत २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी नायक व उपवनसंरक्षक होशिंग यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह प्रकल्पाला भेट देत अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निर्देशानंतर ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दावे सादर केले.प्रकल्पाच्या कॅनलासाठी आवश्यक असलेली जागा प्राप्त केली. याकरिता बाधित वृक्षलागवड खर्च म्हणून सुमारे ४५ लाख ५९० रूपयांचा भरणा लोकवर्गणीतून करण्यात आला. वनजमीन उपलब्ध झाली. मात्र या कालावधीत प्रकल्पाची दुरवस्था झाली होती. १९८४-८५ च्या अतिवृष्टीत सांडव्याच्या बाजूने ४५ मीटर लांब व ११ मीटर खोल पाळ फुटून मोठा खड्डा पडला होता. त्या दुरूस्तीसाठी जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. दुरूस्ती व बांधकामाला निधीची तरतूद तथा तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे हा निधी उपलब्ध होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार गावकरी व जि.प.सिंचन विभागाचे शाखा अभियंता यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतून निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला. पहिल्या टप्प्यात २५ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. फुटलेल्या पाळीचे व पाटाचे दीड ते दोन कोटी खर्चाचे काम शाखा अभियंता यांनी आपले तांत्रिक कौशल्य व गावकºयांच्या सहकार्याने केवळ २५ लाख रूपयांमध्ये पूर्ण केले. फुटलेल्या पाळीमुळे यापूर्वी तलावाची सिंचन क्षमता शून्य झाली होती. मात्र बांधकाम झाल्यानंतर यावर्षी या तलावात ७०९.७५ सहस्त्र घनमीटर पाण्याचा साठा आहे. गावातील मजुरांना ८ हजार ५०० मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. सांडव्याचे बांधकाम, तलावाचे खोलीकरण, तुरूंबाचे बांधकाम व काही पाटांचे सिमेंट काँक्रिटीकरण याकरिता निधीची गरज आहे. २०१७-१८ च्या वार्षिक आरखड्यात नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळताच सदर काम पूर्णत्वास येईल.जांभुळखेडा, येरंडी, गोठणगाव व भीमनपायली येथील शेतकºयांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळेल, अशी माहिती जि.प.सिंचाई उपविभागाचे शाखा अभियंता एम.एन.कुंभारे यांनी दिली. प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच खुशाल डोंगरवार, कृष्णा पाटनकर, वामन ठलाल, तंमुस अध्यक्ष नामदेव दादगाये, तुलाराम नंदेश्वर, मनोहर दोनाडकर, देवानंद लोहंबरे, येनिदास कवरके, दामाजी मेश्राम, देवाजी हलामी, वैशाली हरामी, सुमन हटवार, सुकमाबाई नैताम, मंगलाबाई मेश्राम यांच्यासह गावकरी प्रयत्न करीत आहेत.वनकायद्यात अडकला होता प्रकल्पयेंगलखेडा सिंचन प्रकल्पाला जवळपास १९७८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून निधी प्राप्त झाला. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र १९८२ मध्ये वनकायदा आला. या वनकायद्यामध्ये जे सिंचन प्रकल्प वनजमिनीवर आहेत किंवा त्या सिंचन प्रकल्पांना वनजमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे, असे सिंचन प्रकल्प रद्द करावे, असा स्पष्ट उल्लेख वनकायद्यात होता. त्यामुळे येंगलखेडा सिंचन प्रकल्पाचे काम जवळपास ७० टक्के आटोपून सुद्धा सदर प्रकल्प रखडला होता. मात्र गावकºयांनी केलेल्या प्रयत्नामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाला काही अटी व शर्तीवर मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून चार गावातील जवळपास १०० ते १२५ हेक्टर शेतजमिनीला शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे.