शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बांधकाम विश्रामगृह ते रेल्वे फाटकापर्यंतचा रस्ता बारा मीटर रुंदीचा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता नागपूर यांनी कुरखेडा रोडवरील एस एच ९, क्राॅसिंग गेट नंबर जीपीएफ ५९, किमी ...

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता नागपूर यांनी कुरखेडा रोडवरील एस एच ९, क्राॅसिंग गेट नंबर जीपीएफ ५९, किमी - ११०९/४-३ वडसा - वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज - साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मिती भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु, या भूमिगत पुलातून बस, ट्रॅव्हल्स, मोठे ट्रक यासारखे जड वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे प्रशासन नागपूर यांनी वडसा- नागपूर व वडसा- साकोली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था समपार असलेल्या जीसीएफ - ६० किमी ११०६/४-५ या वडसा -ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्शी - कब्रस्थान -शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून दळणवळण जड वाहतूक वळविण्यात आली होती. दरम्यान, या ठिकाणाहून जड वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने हा रस्ता वारंवार उखडत असल्याने पावसाळ्यात चिखल व खड्डे पडून अपघात होत होते, तर उन्हाळ्यात प्रचंड धूळ उडत असे. यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. हा रस्ता कायमस्वरूपी व मजबूत बांधकाम होण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.

या मागणीची दखल घेऊन या रस्ता बांधकामाला येणाऱ्या ३.२७ काेटी रुपये मूळ किमतीच्या १८ टक्के कमी निविदाधारकाला नगर परिषदेने ८०० मीटर लांबी व १२ मीटर रुंदीच्या रस्ता बांधकामाला २.८० काेटी रुपये किमतीच्या बांधकामाला मंजुरी प्रदान करून मुख्याधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स :

रस्त्यालगतच्या अतिक्रमणधारकांना नोटीस

देसाईगंज शहराच्या कन्नमवार वाॅर्डातील सार्वजनिक बांधकाम विभाग ते रेल्वे फाटकापर्यंत सार्वजनिक १२ मीटर रुंद रस्त्याच्या लगत अवैधरीत्या पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी याबाबत नोटीस मिळाल्याच्या तीस दिवसांच्या आत ते अवैधरीत्या केलेले बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्याेगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये कारवाई करून ते अतिक्रमण नगर परिषद यंत्रणेमार्फत काढण्यात येईल व याकामी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडुन दंडाच्या शुल्कासह सक्तीने वसूल करण्यात येईल. यानंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे मुख्याधिकाऱ्यांनी १ सप्टेंबरला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.