शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

रस्त्यांना चिखलाचा विळखा

By admin | Updated: July 29, 2014 23:48 IST

मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी गाळही साचला. मात्र ग्रा. पं. वेलगूर परिसरातील ग्रा. पं. किष्ठापूर अंतर्गत येणाऱ्या चार

वेलगूर : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी गाळही साचला. मात्र ग्रा. पं. वेलगूर परिसरातील ग्रा. पं. किष्ठापूर अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावातील अंतर्गत रस्त्यांना चिखलाने विळखा घातल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. मात्र ग्रा. पं. प्रशासनाच्यावतीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करण्यात आली. परंतु बहुतांश ठिकाणचा गाळ उचलण्यात आला नाही. नाल्यातील गाळाची विल्हेवाट लावण्याच्या कामाकडे ग्रा. पं. प्रशासनाने सर्रासपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला उपसलेला नाल्यांचा गाळ पावसाने डांबरी व सिमेंट रस्त्यावर पसरला. परिणामी रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने नागरिकांना ये-जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने नाल्यातील उपसलेल्या गाळाची विल्हेवाट न लावण्यात आल्याने गावात घाण पसरली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायत वेलगूर येथे चार सफाई कामगार काम करीत आहेत. परंतु कामगारांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते आपल्या कामात दिरंगाई करीत आहेत, असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे. नवेगाव येथील मुख्य रस्ता ते तुकाराम झोडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. चिखलामुळे रोगराई पसरण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तविली आहे. ग्रामपंचायत वेलगूर व किष्ठापूर येथील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात घाण पसरली आहे. त्यामुळे नाल्यांचा उपसा केलेला गाळ ग्रा. पं. प्रशासनाने त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला गावात मुरूम टाकण्याचे काम ग्रा. पं. ने का केले नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)