शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाचे क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:23 IST

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअंतिम पीक अहवालात आणखी होईल वाढ : पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.२०१८ च्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुध्दा तेवढेच आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ७१ हजार ३९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत अधिक प्रमाणात धानाची लागवड झाली असल्याचे दिसून येते. १५ दिवसानंतर अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामध्ये धानाचे क्षेत्र आणखी वाढले असण्याची शक्यता कृषी अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.धानाच्या पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाही. खर्चाच्या तुलनेत धान पिकाला कमी भाव मिळतो, अशी टीका केली जाते. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी धान पिकाला वगळून इतर पिकांची लागवड करतात. सर्वसाधारण शेतकरी मात्र धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी खर्च निघेल, याची शाश्वती असल्याने येथील शेतकरी धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी हलक्या धान पिकाची लागवड करतात. हलके धान पीक आता गर्भात आहे. त्यामुळे यानंतर एक जरी पाऊस पडला तरी धानाचे उत्पादन होते. इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या लागवडीचा खर्च कमी आहे व हमखास उत्पादन होत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही धान पिकाच्या लागवडीला पसंती दर्शवितात. परिणामी धान पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सोयाबिनच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. सुमारे १० हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जात होती. मात्र मागील वर्षांपासून सोयाबिन पिकास दगा देण्यास सुरूवात केल्याने सदर शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मका व इतर पिकांची लागवड केली. धान उत्पादक शेतकरी मात्र धानाच्या लागवडीवर ठाम आहे. तसेच नवीन शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी धानाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. त्यामुळे धानाच्या लागवडीचे कौशल्य व माहिती येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे इतर पिकांची लागवड करून धोका पत्करण्यापेक्षा धानाची लागवड केली जाते. त्यामुळे धानाच्या क्षेत्रात दरवर्षीने भर पडत आहे.३१ हेक्टरवर आवत्यायावर्षी पावसाने शेतकऱ्यांना आवत्या टाकण्यास चांगली सवलत दिली. त्यामुळे दवर्षीच्या तुलनेत आवत्याचे क्षेत्र वाढले आहे. एटापल्ली, धानोरा, कोरची या तालुक्यांमधील शेतकरी आवत्या टाकण्यास अधिक प्राधान्य देतात.पावसामुळे सोयाबीन व कापसाची स्थिती चिंताजनकयावर्षी सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. सोयाबीन व कापूस या पिकांना अत्यंत कमी प्रमाणात पाणी आवश्यक आहे. जमिनीत काही प्रमाणात ओलावा असला तरी चालते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेत जमिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी सोयाबिन व कापूस या दोन्ही पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचा खर्च केल्यानंतरही त्यांचा उत्पादन खर्च भरून निघणार की नाही, अशी पिकांची स्थिती आहे. त्यामुळे सदर शेतकरी चिंताग्रस्त आहे. उलटपक्षी धान पिकाला थंड व मुबलक प्रमाणात पावसाची गरज आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे पीक डोलत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणीची कामे अगदी वेळेत आटोपली. त्यामुळे धानाच्या उत्पादनात यावर्षी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती