शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

धान पिकाचे क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:23 IST

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअंतिम पीक अहवालात आणखी होईल वाढ : पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.२०१८ च्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुध्दा तेवढेच आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ७१ हजार ३९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत अधिक प्रमाणात धानाची लागवड झाली असल्याचे दिसून येते. १५ दिवसानंतर अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामध्ये धानाचे क्षेत्र आणखी वाढले असण्याची शक्यता कृषी अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.धानाच्या पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाही. खर्चाच्या तुलनेत धान पिकाला कमी भाव मिळतो, अशी टीका केली जाते. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी धान पिकाला वगळून इतर पिकांची लागवड करतात. सर्वसाधारण शेतकरी मात्र धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी खर्च निघेल, याची शाश्वती असल्याने येथील शेतकरी धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी हलक्या धान पिकाची लागवड करतात. हलके धान पीक आता गर्भात आहे. त्यामुळे यानंतर एक जरी पाऊस पडला तरी धानाचे उत्पादन होते. इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या लागवडीचा खर्च कमी आहे व हमखास उत्पादन होत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही धान पिकाच्या लागवडीला पसंती दर्शवितात. परिणामी धान पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सोयाबिनच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. सुमारे १० हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जात होती. मात्र मागील वर्षांपासून सोयाबिन पिकास दगा देण्यास सुरूवात केल्याने सदर शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मका व इतर पिकांची लागवड केली. धान उत्पादक शेतकरी मात्र धानाच्या लागवडीवर ठाम आहे. तसेच नवीन शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी धानाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. त्यामुळे धानाच्या लागवडीचे कौशल्य व माहिती येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे इतर पिकांची लागवड करून धोका पत्करण्यापेक्षा धानाची लागवड केली जाते. त्यामुळे धानाच्या क्षेत्रात दरवर्षीने भर पडत आहे.३१ हेक्टरवर आवत्यायावर्षी पावसाने शेतकऱ्यांना आवत्या टाकण्यास चांगली सवलत दिली. त्यामुळे दवर्षीच्या तुलनेत आवत्याचे क्षेत्र वाढले आहे. एटापल्ली, धानोरा, कोरची या तालुक्यांमधील शेतकरी आवत्या टाकण्यास अधिक प्राधान्य देतात.पावसामुळे सोयाबीन व कापसाची स्थिती चिंताजनकयावर्षी सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. सोयाबीन व कापूस या पिकांना अत्यंत कमी प्रमाणात पाणी आवश्यक आहे. जमिनीत काही प्रमाणात ओलावा असला तरी चालते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेत जमिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी सोयाबिन व कापूस या दोन्ही पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचा खर्च केल्यानंतरही त्यांचा उत्पादन खर्च भरून निघणार की नाही, अशी पिकांची स्थिती आहे. त्यामुळे सदर शेतकरी चिंताग्रस्त आहे. उलटपक्षी धान पिकाला थंड व मुबलक प्रमाणात पावसाची गरज आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे पीक डोलत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणीची कामे अगदी वेळेत आटोपली. त्यामुळे धानाच्या उत्पादनात यावर्षी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती