शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाचे क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:23 IST

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअंतिम पीक अहवालात आणखी होईल वाढ : पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.२०१८ च्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुध्दा तेवढेच आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ७१ हजार ३९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत अधिक प्रमाणात धानाची लागवड झाली असल्याचे दिसून येते. १५ दिवसानंतर अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामध्ये धानाचे क्षेत्र आणखी वाढले असण्याची शक्यता कृषी अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.धानाच्या पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाही. खर्चाच्या तुलनेत धान पिकाला कमी भाव मिळतो, अशी टीका केली जाते. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी धान पिकाला वगळून इतर पिकांची लागवड करतात. सर्वसाधारण शेतकरी मात्र धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी खर्च निघेल, याची शाश्वती असल्याने येथील शेतकरी धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी हलक्या धान पिकाची लागवड करतात. हलके धान पीक आता गर्भात आहे. त्यामुळे यानंतर एक जरी पाऊस पडला तरी धानाचे उत्पादन होते. इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या लागवडीचा खर्च कमी आहे व हमखास उत्पादन होत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही धान पिकाच्या लागवडीला पसंती दर्शवितात. परिणामी धान पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सोयाबिनच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. सुमारे १० हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जात होती. मात्र मागील वर्षांपासून सोयाबिन पिकास दगा देण्यास सुरूवात केल्याने सदर शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मका व इतर पिकांची लागवड केली. धान उत्पादक शेतकरी मात्र धानाच्या लागवडीवर ठाम आहे. तसेच नवीन शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी धानाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. त्यामुळे धानाच्या लागवडीचे कौशल्य व माहिती येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे इतर पिकांची लागवड करून धोका पत्करण्यापेक्षा धानाची लागवड केली जाते. त्यामुळे धानाच्या क्षेत्रात दरवर्षीने भर पडत आहे.३१ हेक्टरवर आवत्यायावर्षी पावसाने शेतकऱ्यांना आवत्या टाकण्यास चांगली सवलत दिली. त्यामुळे दवर्षीच्या तुलनेत आवत्याचे क्षेत्र वाढले आहे. एटापल्ली, धानोरा, कोरची या तालुक्यांमधील शेतकरी आवत्या टाकण्यास अधिक प्राधान्य देतात.पावसामुळे सोयाबीन व कापसाची स्थिती चिंताजनकयावर्षी सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. सोयाबीन व कापूस या पिकांना अत्यंत कमी प्रमाणात पाणी आवश्यक आहे. जमिनीत काही प्रमाणात ओलावा असला तरी चालते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेत जमिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी सोयाबिन व कापूस या दोन्ही पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचा खर्च केल्यानंतरही त्यांचा उत्पादन खर्च भरून निघणार की नाही, अशी पिकांची स्थिती आहे. त्यामुळे सदर शेतकरी चिंताग्रस्त आहे. उलटपक्षी धान पिकाला थंड व मुबलक प्रमाणात पावसाची गरज आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे पीक डोलत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणीची कामे अगदी वेळेत आटोपली. त्यामुळे धानाच्या उत्पादनात यावर्षी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती