शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरटीओला सव्वा कोटींवर महसूल गतवर्षीपेक्षा यंदा महसुलात वाढ

By admin | Updated: March 14, 2016 01:19 IST

शासनाने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ५९ लाख १० हजारांचे वाहन नोंदणी, ...

गडचिरोली : शासनाने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ५९ लाख १० हजारांचे वाहन नोंदणी, नूतनीकरण व इतर बाबी अंतर्गत महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओ कार्यालयाला एप्रिल ते जानेवारी २०१६ या १० महिन्यांच्या कालावधीत एकूण १ कोटी ३९ लाख १४ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. वर्ष संपण्यापूर्वीच आरटीओ कार्यालयाने शासनाने दिलेल्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. आरटीओ विभागाने प्राप्त केलेल्या महसुलामध्ये समझोता शुल्क, जुने तसेच नवीन वाहनापासून मिळालेल्या कराचा समावेश आहे. याशिवाय आरटीओ विभाग व गठित करण्यात आलेल्या पथकाने गृहराज्य व आंतरराज्यीय शुल्काचा समावेश आहे. आरटीओ विभागाने ८८.८२ लाखांचा महसूल गृहराज्य व ५०.३५ लाख रूपये आंतरराज्यीय महसूल प्राप्त केला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून इतर राज्यांना जोडणारे मार्ग जातात. त्यामुळे इतर राज्यातील वाहनांचे आवागमन गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होत असते. आरटीओ विभागाच्या वतीने इतर राज्यातील वाहनधारकांकडून ५० लाख ३५ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवीन वाहनधारक आरटीओ कार्यालयात जाऊन सर्व शुल्क अदा करून आपल्या नव्या वाहनाची नोंदणी करीत असतात तसेच जुने वाहनधारकही आपली नोंदणी व परवाना नूतनीकरण दरवर्षी करतात. या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळते. (स्थानिक प्रतिनिधी)जुलै महिन्यात सर्वाधिक महसूलउपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ या १० महिन्यांच्या कालावधीत एकूण १ कोटी ३९ लाख १४ हजार रूपयांचा महसूल प्राप्त केला. यामध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक २१ लाख २१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल महिन्यात १५ लाख ४२ हजार, मे महिन्यात १६ लाख ७ हजार, जून ११ लाख ८६ हजार, आॅगस्ट १३ लाख २५ हजार, सप्टेंबर १३ लाख ६७ हजार, आॅक्टोबर १३ लाख ९८ हजार, नोव्हेंबर १५ लाख ८३ हजार, डिसेंबर, ११ लाख ७४ हजार व जानेवारी महिन्यात ६ लाख ११ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नियम तोडणाऱ्या ८४५ वाहनधारकांकडून ५ कोटी ८१ लाखांचा दंड वसूलउपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वायुवेग पथकाने प्रमुख मार्गावर गस्त घालून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण ८४५ वाहनधारकांकडून एप्रिल २०१५ ते फरवरी २०१६ या ११ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ लाख ८१ हजार ५०५ रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये अवैध प्रवासी वाहन व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.आरटीओ विभागाच्या वतीने जुन्या व नव्या वाहनधारकांकडून कराच्या रूपात १ कोटी ३९ लाख रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. तसेच अवैध प्रवासी वाहनधारकांकडून ५ लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात १ लाखांच्या वर दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. अवैध वाहनधारकांच्या विरोधात कारवाई सत्र सुरू आहे. - शांताराम फासे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली