शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला चिंतन करायला लावणारा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:26 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते. पण तसे झाले नाही आणि भाजपला निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अनपेक्षितपणे काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांनी तब्बल ४९१ मते घेऊन भाजपला आश्चर्याचा धक्का दिला. विधान परिषदेसारख्या घोडेबाजारावर चालणाऱ्या निवडणुकीत असे धक्के बसणे नवीन नाही. पण अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वाढलेले हे मताधिक्य भाजपला चिंतन करायला लावणारे आहे.राजकारणात कायमसाठी कोणीही कोणाचे नसते असे म्हटले जाते. अर्थात या वाक्याचा अर्थ एखाद्या पक्षाचे ध्येयधोरण पटले नाही तर दुसºया पक्षाच्या तंबूत जाऊन बसणे असा असू शकतो. राजकीय सोयीसाठी अशी पक्षांची अदलाबदली करणे नवीन नाही. पण नितीमत्ता, धोरण वगैरे बासनात गुंडाळून राजकीय पक्षांचे पदाधिकारी जर केवळ आर्थिक लाभासाठी एखाद्या पक्षाला मदत करीत असेल तर ही बाब त्या पक्षासाठी निश्चितच चिंताजनक आहे. विशेषत: भाजपसारख्या नैतिकतेवर, विचारधारेवर आपला पक्ष चालतो असा दावा करणाºया पक्षाचेही हक्काचे मतदार जेव्हा त्यांना धोका देतात, तेव्हा भविष्यातील गडबडीची ती चाहुल आहे असे मानण्यास हरकत नाही.या निवडणुकीत भाजपचे हक्काचे मतदार ५०७ असले तरी भाजपला ५२८ मते मिळाली. म्हणजे इतर पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी भाजपला मदत केली हे निश्चित. पण भाजपची पूर्णपैकी पूर्ण मते भाजपला मिळाली नाही हेही तितकेच खरे आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे आपल्या हक्काची २७२ आणि राष्टÑवादी काँग्रेसची ९० मते मिळून ३६२ मते होती. पण शिवसेना, बसपा, भारिप यांच्यासह अपक्षांनी मदत केल्यामुळेच काँग्रेसच्या पारड्यात ४९१ मते पडू शकली. घोडेबाजारात मतांची घेवाण-देवाण होत असली तरी सत्ताधारी भाजपच्या उमेदवाला सोडून काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजुने उभे झालेले हे सर्वपक्षीय मतदार भविष्यात भाजपसाठी ‘खतरे की घंटी’ ठरू शकतात. भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेची फळे चाखणाºया शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली. एवढेच काय, ८४ अपक्षांपैकी मोजक्याच लोकांची भाजपला साथ मिळू शकली. या निवडणुकीत काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ हे जरी नवखे उमेदवार असले तरी त्यांच्या मागे उभे असणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मतांचे हे गणित जुळवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावून आपली अजूनही पकड असल्याचे दाखवून दिले.या निवडणुकीत निसटता का होईल, भाजपला विजय मिळाला हे मात्र खरे आहे. त्यामुळे े‘जो जिता वही सिकंदर’ याप्रमाणे डॉ.आंबटकर सिकंदर ठरले आहे. आता त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करून त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या महत्वाच्या विषयाला त्यांनी हात घालून ते मंजूर करून आणल्यास जिल्ह्याच्या विकासातील तो एक मैलाचा दगड ठरेल. संघनिष्ठ म्हणून त्यांची गडकरी, फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्यांशी जवळीकता आहे. त्याचा फायदा घेत आंबटकर अनेक कामे या जिल्ह्यासाठी खेचून आणतील अशी अपेक्षा ठेवुया.

टॅग्स :BJPभाजपा