शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अहेरी जिल्हा करण्याची जबाबदारी आता भाजपवर

By admin | Updated: October 21, 2014 22:51 IST

विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ

अहेरी : विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशीही मागणी नाविस सातत्याने करत राहिला. गेल्या काही वर्षात नाग विदर्भ आंदोलन समितीने या मागणीला घेऊन आंदोलनही केलेत. आता नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी मर्यादित कालावधीत स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करून या भागातील आदिवासी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी केली आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात उपविभागातील पाच तालुक्यांसह १२ तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय झाले असले तरी अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यांचे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे अंतर किमान २५० किमीपेक्षा अधिक आहे. या भागातील तालुक्यातील गाव अरण्यप्रदेशात व दुर्गम भागात विस्तारलेली आहे. त्यांना गडचिरोली तालुका मुख्यालयात यायचे झाल्यास त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी जातो. तसेच आर्थिक फटकाही त्यांना बसतो. त्यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, ही मागणी करीत आहे. अहेरी उपविभागातील तालुक्यांनी नक्षल समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून अहेरी उपविभागात एकही मोठा सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर सिमेंट व लोह खनिजाचे साठे आहे. या भागात देवलमरी, सुरजागड येथे लोह व सिमेंट प्रकल्प सुरू करू असे आश्वासन आजवरच्या राज्यकर्त्यांनी दिले होते. मात्र एकही प्रकल्प येथे सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे व यातूनच नक्षलवाद वाढीला लागला आहे. या भागातील आदिवासींना समाजाच्या मुख्य धारेसोबत जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत आहे. २०१० नंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्यावर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने एटापल्ली येथे नवे उपविभागीय अधिकारी कार्यालय निर्माण केले व अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात आले. त्यांनतरही विकासाची प्रक्रिया गतीमान झाली नाही. या भागात वनकायद्यामुळे अनेक गावांना वीज पोहोचविण्यास अडचण आहे. जर अहेरी हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. अहेरी येथे एमआयडीसी निर्माण झाल्यास महाराष्ट्रातील उद्योजक येथे येऊन लोह खनिज उद्योग निर्माण करू शकतात. या भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळू शकते. स्वतंत्र जिल्हा झाल्यास येथे कुशल कामगार निर्माण करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणाची व्यवस्थाही निर्माण होऊ शकते व या पाच तालुक्याच्या विकासाला गती देता येऊ शकते. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, अशी भावना या भागातील आदिवासी, गैरआदिवासी समुदाय व्यक्त करीत आहे.अम्ब्रीशराव महाराजांच्या रूपाने एक तरूण लोकप्रतिनिधी या भागाला मिळाल्यामुळे या भागातील जनतेला अहेरी जिल्हा निर्माण होईल, अशी आशा वाटत आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीने भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरच पाठिंबा दिला होता. आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे भाजपसोबत नाविसची तेवढीच जबाबदारी आहे, असे मतदारांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)