शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

अहेरी जिल्हा करण्याची जबाबदारी आता भाजपवर

By admin | Updated: October 21, 2014 22:51 IST

विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ

अहेरी : विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशीही मागणी नाविस सातत्याने करत राहिला. गेल्या काही वर्षात नाग विदर्भ आंदोलन समितीने या मागणीला घेऊन आंदोलनही केलेत. आता नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी मर्यादित कालावधीत स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करून या भागातील आदिवासी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी केली आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात उपविभागातील पाच तालुक्यांसह १२ तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय झाले असले तरी अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यांचे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे अंतर किमान २५० किमीपेक्षा अधिक आहे. या भागातील तालुक्यातील गाव अरण्यप्रदेशात व दुर्गम भागात विस्तारलेली आहे. त्यांना गडचिरोली तालुका मुख्यालयात यायचे झाल्यास त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी जातो. तसेच आर्थिक फटकाही त्यांना बसतो. त्यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, ही मागणी करीत आहे. अहेरी उपविभागातील तालुक्यांनी नक्षल समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून अहेरी उपविभागात एकही मोठा सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर सिमेंट व लोह खनिजाचे साठे आहे. या भागात देवलमरी, सुरजागड येथे लोह व सिमेंट प्रकल्प सुरू करू असे आश्वासन आजवरच्या राज्यकर्त्यांनी दिले होते. मात्र एकही प्रकल्प येथे सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे व यातूनच नक्षलवाद वाढीला लागला आहे. या भागातील आदिवासींना समाजाच्या मुख्य धारेसोबत जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत आहे. २०१० नंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्यावर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने एटापल्ली येथे नवे उपविभागीय अधिकारी कार्यालय निर्माण केले व अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात आले. त्यांनतरही विकासाची प्रक्रिया गतीमान झाली नाही. या भागात वनकायद्यामुळे अनेक गावांना वीज पोहोचविण्यास अडचण आहे. जर अहेरी हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. अहेरी येथे एमआयडीसी निर्माण झाल्यास महाराष्ट्रातील उद्योजक येथे येऊन लोह खनिज उद्योग निर्माण करू शकतात. या भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळू शकते. स्वतंत्र जिल्हा झाल्यास येथे कुशल कामगार निर्माण करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणाची व्यवस्थाही निर्माण होऊ शकते व या पाच तालुक्याच्या विकासाला गती देता येऊ शकते. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, अशी भावना या भागातील आदिवासी, गैरआदिवासी समुदाय व्यक्त करीत आहे.अम्ब्रीशराव महाराजांच्या रूपाने एक तरूण लोकप्रतिनिधी या भागाला मिळाल्यामुळे या भागातील जनतेला अहेरी जिल्हा निर्माण होईल, अशी आशा वाटत आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीने भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरच पाठिंबा दिला होता. आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे भाजपसोबत नाविसची तेवढीच जबाबदारी आहे, असे मतदारांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)