शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

पीक विमा योजनेस प्रतिसाद वाढला

By admin | Updated: October 16, 2016 00:54 IST

गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून ...

प्रभावी जनजागृतीचा परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीवर शेतकरी सहभागीगडचिरोली : गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून एकूण ११ हजार १५२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्हाभरातून तब्बल २३ हजार ७८६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून दुपटीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. कृषी विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृती करण्यात आल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तब्बल २२ हजार २६७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यामध्ये कॅनरा बँकेतर्फे २६, सीबीआय १३४, बीओआय १ हजार ९४५, आयडीबीआय २५७, यूबीआय ८५, बीओएम २ हजार ३२, एसबीआय १ हजार ५९७, व्हीकेजीबी २ हजार ६४ व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक १४ हजार ८२७ शेतकऱ्यांनी बचतखाते काढून पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. २२ हजार ९६७ कर्जदार शेतकऱ्यांनी ३०,१०५.८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. ८१९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ८३७.२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा यंदाच्या खरीप हंगामात विमा काढला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार मिळून एकूण २३ हजार ७८६ शेतकऱ्यांनी २ कोटी ४१ लाख ८४ हजार रूपयांचे प्रिमियम सादर पीक विमा योजनेंतर्गत भरले आहेत. यावर्षीपासून नव्यानेच कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम गावांसह ग्रामीण भागात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली. त्यानंतर सदर पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)५०६ कोटी रक्कम अदा करण्यास मान्यता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६ च्या विमा हप्ता अनुदानातील राज्य शासनाच्या हिस्स्याची ५०६ कोटी ८५ लाख ४८ हजार रूपये अदा करण्यास राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. यासंदर्भात राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने १३ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार चार विमा कंपन्यांना सदर रक्कम शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ मध्ये राबविणाऱ्या सर्व कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत विमा हप्ता अनुदानातील येणारा राज्य शासनाचा हिस्सा म्हणून ५०६ कोटी ८५ लाख ४८ हजार रूपये वितरित करण्याबाबत कृषी आयुक्तालयाने शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सदर रक्कम अदा करण्यास मंजुरी प्रदान केली.पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम५ जुलै २०१६ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयात पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीक विमा हप्त्याच्या रकमेचा तपशील नमूद करण्यात आला आहे. भातपिकाला प्रति हेक्टर ३९ हजार रूपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांनी ७८० रूपये पीक विमा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारी पिकांसाठी प्रति हेक्टर २४ हजार रूपये, मका २५ हजार रूपये, तूर २८ हजार, मूग १८ हजार व उडीद १८ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम नमूद करण्यात आली आहे.गतवर्षी ५ हजार ४९९ शेतकऱ्यांना विम्याचा लाभराष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षी २०१५ च्या खरीप हंगामात एकूण ११ हजार १५२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले, असे एकूण ५ हजार ४९९ शेतकरी विम्याच्या रकमेसाठी पात्र ठरले व या शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख ९० हजार २२५ रूपये विम्याच्या स्वरूपात अदा करण्यात आले. यावर्षीही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.