शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

ग्रामीण भागातील जलसाठे पडले कोरडे

By admin | Updated: May 23, 2017 00:42 IST

तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाणी टंचाई तीव्र : पशुंची पाण्यासाठी भटकंती वाढली; तलाव व बोड्या आटल्यालोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बाहेर पाणी मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांना घरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.आरमोरी तालुक्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक गावात माजी मालगुजारी तलाव व लहान मोठ्या बोड्या आहेत. या बोड्यांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यानंतर मात्र या तलाव व बोड्या वन्यजीव तसेच पाळीव प्राण्यांची तहाण भागविण्यास फार मोठी मदत करतात. पाळीव जनावरे चरायला गेल्यानंतर तलाव व बोड्यांवरच पाणी पिऊन येत असल्याने त्यांना घरी पाणी पाजण्याची गरज भासत नाही. मात्र उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात तलाव व बोड्या आटण्यास सुरूवात झाली आहे. बहुतांश बोड्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांना बाहेर पाणी पिण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. परिणामी गावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावातीलही विहिरी व हातपंप आटल्या आहेत. अशातच पाळीव प्राण्यांचीही तहान भागवावी लागत असल्याने पशु पालकांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तलाव व बोड्या आटल्यामुळे वन्यजीवांसमोरही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव गावात आल्यामुळे त्यांचे शिकारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी जवळपास २० दिवस पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट तीव्र झाले आहे. बंद हातपंप दुरूस्तीकडे यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतींनी विहिरींचा उपसा करणे आवश्यक आहे.