शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अखेर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:46 IST

ग्राम पंचायतीचे बहुतांश अधिकार सरपंचाकडे राहतात. त्यामुळे सरपंचपदाला ग्राम पंचायत स्तरावर विशेष महत्त्व आहे. मात्र नेमक्या याच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे ६ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. त्याच्या एक दिवसाआधीच, म्हणजे ५ मार्च रोजी अधिसूचना काढून शासनाने आरक्षण जाहीर केले आहे.

ठळक मुद्देनिवड सदस्यांमधूनच होणार : जातवैधता प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे इच्छुकांची वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर शासनाने ५ मार्च रोजी अधिसूचना काढून राज्यभरातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले आहे. तसेच सरपंचाची निवड सदस्यांमधूनच केली जाणार असल्याचे परिपत्रकही राज्य शासनाने काढले आहे. त्यामुळे आता २९१ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाला गती येणार आहे.ग्राम पंचायतीचे बहुतांश अधिकार सरपंचाकडे राहतात. त्यामुळे सरपंचपदाला ग्राम पंचायत स्तरावर विशेष महत्त्व आहे. मात्र नेमक्या याच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे ६ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. त्याच्या एक दिवसाआधीच, म्हणजे ५ मार्च रोजी अधिसूचना काढून शासनाने आरक्षण जाहीर केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २९१ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यातील १६३ ग्राम पंचायत पेसाअंतर्गत येत असल्याने या ग्राम पंचायतींमधील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव राहील हे निश्चित होते. बिगर अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या १२८ ग्राम पंचायतींमधील सरपंच पदाचे आरक्षण शासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये १४ ग्राम पंचायतींमधील सरपंच पदे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवली आहेत. त्यापैकी ७ पदे अनुसूचित महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातींसाठी ७ ग्राम पंचायती राखीव असून त्यापैकी ४ महिलांसाठी राखीव आहेत. नामाप्र साठी ३५ ग्राम पंचायतींमधील सरपंचपद राखीव आहे. त्यापैकी १८ ग्राम पंचायती महिलांसाठी राखीव आहेत. ७२ ग्राम पंचायती खुल्या असून त्यापैकी ३६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात होणार आहे.जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकचग्राम पंचायत निवडणुकीसाठी राखीव जागेवर निवडणूक लढविणाºया उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे जात वैधतेसाठी अर्ज केला असल्याचा पुरावा किंवा सदर अर्जाची सत्यप्रत नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी करण्याची सवलत उमेदवारांना देण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांना १२ महिन्यांच्या आत जात पडताळणी समितीने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र त्याचे अधिनियमात रूपांतर झाले नाही, त्यामुळे चालू ग्राम पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.पहिल्या दिवशी नामांकनाची पाटी कोरीचग्राम पंचायत निवडणुकीसाठी ६ मार्चपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. मात्र पहिल्या दिवशी जिल्हाभरात एकाही तालुक्यात नामांकन दाखल झाले नाही. शनिवारी व रविवारी सुटी आहे. त्यामुळे सोमवारपासून नामांकन भरण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी धुलिवंदनानिमित्त शासकीय सुटी आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी आता उमेदवारांना केवळ चारच दिवस शिल्लक आहेत.प्रमाणपत्राअभावी अनेक इच्छुकांचा होणार हिरमोडनामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळीच जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. दुर्गम भागातील नागरिकांकडे जातवैधता प्रमाणपत्र राहात नाही. ऐनवेळेवर हे प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असताना केवळ हे प्रमाणपत्र नाही म्हणून निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे. जात वैैधता प्रमाणपत्राच्या अटीमुळे अनेकांना अर्ज भरणे शक्य होणार नसल्याने काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत