शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे नसतानाही धानोरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांमुळे खळबळ : भुसावळ येथून परतले होते गावी; रूग्ण असलेला परिसर केला प्रतिबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील दोन रूग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, क्वॉरंटाईन कालावधीत जळपास १४ दिवस त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. तरीही ते कोरोनाबाधित आढळल्यामुळे धानोरा शहरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे त्यांची १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर सुटी करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने दोघांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. २८ मे रोजी या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्या रुग्णांचे घर व परिसर सील करण्यात आला आहे. तसेच रूग्णांना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्या वार्डातील प्रत्येक नागरिकाची दरदिवशी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. धानोरातील मार्केट पूर्णपणे बंद ठेवले आहे. मात्र रूग्ण सापडलेल्या परिसरातील काही भागातच जंतूनाशकांची फवारणी केली. वेळ झाल्याचे कारण सांगून आरोग्य विभागाचे पथक परत गेले, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.काही दिवस थांबले घरीभुसावळ वरून आल्यानंतर आरोग्य विभागाने मुलगा व आई दोघांनाही संस्थात्मक क्वॉरंटाईन केले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. २५ मे ला सुटी दिली, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून २५ ते २८ मे पर्यंत दोघेही स्वत:च्या घरी थांबले होते. त्यामुळे ते राहत असलेल्या वॉर्डवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा वार्डात कोणाकोणाशी संपर्क आला, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी केले आहे.धानोरा तालुक्यात शासकीय आदिवासी मुले व मुलींचे वसतिगृह, सोडे व पेंढरी येथील आश्रमशाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी २८ मे पर्यंत ९६ लोक थांबले आहेत. १०० लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६५ नमुन्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला. तर ३५ नमुन्यांचा रिपोर्ट अजून येणे शिल्लक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या