शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

लक्षणे नसतानाही धानोरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांमुळे खळबळ : भुसावळ येथून परतले होते गावी; रूग्ण असलेला परिसर केला प्रतिबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील दोन रूग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, क्वॉरंटाईन कालावधीत जळपास १४ दिवस त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. तरीही ते कोरोनाबाधित आढळल्यामुळे धानोरा शहरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे त्यांची १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर सुटी करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने दोघांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. २८ मे रोजी या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्या रुग्णांचे घर व परिसर सील करण्यात आला आहे. तसेच रूग्णांना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्या वार्डातील प्रत्येक नागरिकाची दरदिवशी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. धानोरातील मार्केट पूर्णपणे बंद ठेवले आहे. मात्र रूग्ण सापडलेल्या परिसरातील काही भागातच जंतूनाशकांची फवारणी केली. वेळ झाल्याचे कारण सांगून आरोग्य विभागाचे पथक परत गेले, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.काही दिवस थांबले घरीभुसावळ वरून आल्यानंतर आरोग्य विभागाने मुलगा व आई दोघांनाही संस्थात्मक क्वॉरंटाईन केले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. २५ मे ला सुटी दिली, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून २५ ते २८ मे पर्यंत दोघेही स्वत:च्या घरी थांबले होते. त्यामुळे ते राहत असलेल्या वॉर्डवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा वार्डात कोणाकोणाशी संपर्क आला, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी केले आहे.धानोरा तालुक्यात शासकीय आदिवासी मुले व मुलींचे वसतिगृह, सोडे व पेंढरी येथील आश्रमशाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी २८ मे पर्यंत ९६ लोक थांबले आहेत. १०० लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६५ नमुन्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला. तर ३५ नमुन्यांचा रिपोर्ट अजून येणे शिल्लक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या