शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

येंगलखेडावासीयांच्या लढ्यानंतर तलावाची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्दे३४४ एकराला सिंचनाची क्षमता : जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : वनकायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या जांभुळखेडा येथील सिंचन तलावासाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. तलावासोबत कालव्याचेही काम पूर्ण झाले आहे. गुरूवारी (दि.२३) जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने जांभुळखेडावासीयांनी आनंद व्यक्त केला. या तलावामुळे ३४४ एकर श्ोती सिंचनाखाली येणार आहे. हा तलाव गावाच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.यावेळी आमदार कृष्णा गजबे, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, तहसीलदार सोमनाथ माळी, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दमाहे, उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, सरपंच शिवाजी राऊत व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. एकूणच हा तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. गावकरी, राजकीय नेते आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचे जांभूळखेड्याचा तलाव हे उत्तम उदाहरण आहे.अन् तलाव पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाजांभुळखेडा गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर ४० हेक्टर जागेत असलेला सिंचन तलाव वनकायद्याच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान १९८५ च्या पावसाळ्यात पाळ फुटल्याने तलावाचे अतोनात नुकसान झाले. तलावाच्या दुरूस्तीसाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

टॅग्स :Damधरण