शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बंद सिंचन योजना दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:48 IST

सन १९८० च्या वन कायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले; निधी खर्चाची चौकशी करा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सन १९८० च्या वन कायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात विद्यमान सरकार व प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या ११ सिंचन योजनेचे काम योग्यरीत्या करण्यात आले नाही. या कामांची चौकशी करून बंद करण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी व देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात लघुसिंचन (जलसंधारण) विभाग, चंद्रपूर विभागातर्फे केंद्र सरकार पुरस्कार एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील ११ सिंचन योजनेचे बांधकाम करण्यात आले़ उपसा सिंचनाचे बांधकामाकरिता नदीपात्रात विहिरीचे बांधकाम करण्यात आलेले होते़उपसा सिंचन योजनेचे बांधकाम करताना नदी पात्रात ३५ फुट खोल लोखंडी जाळी बसवून विहीर पाणी उपसा करण्यासाठी बांधलेली होती़. त्या विहीरीची लोखंडी जाळी कुजल्यामुळे नदीतील गाळ व रेती विहीरीत भरल्याने सबमर्शीबल मोटरद्वारे पाणी उपसा करणे अशक्य झाले़ त्या विहीरीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली होती़ मात्र त्या विहिरीची दुरुस्ती करण्याऐवजी या योजनेत विहिरीचे बांधकाम करण्यात आलेले नव्हते, असा खोटा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला आहे़ त्याचप्रकारे संबधीत सिंचन विभागामार्फत बांधकाम करण्यात आलेल्या ११ च्या ११ ही योजंना अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे बंद पडलेल्या आहे. यामध्ये कृपाळा ता. गडचिरोली, उपसा सिंचन पेंढरी ता़ धानोरा, उपसा सिंचन पयडी, ता़ धानोरा, उपसा सिंचन खुर्सा ता. गडचिरोली या चार ही योजनांचा समावेश आहे. सदर योजना बंद असतानासुद्धा त्या सुरू असल्याचा खोटा अहवाल सिंचाई विभागा मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे़, असेही निवेदनात म्हटले आहे आहे.सदर उपसा सिंचन योजनांपैकी चामोर्शी तालुक्यातील नवेगाव, रैतवारी व थाटरी येथील उपसा सिंचनाचे बांधकाम पुर्ण करुन पाणी वापर संस्था गठीत करण्याचे काम सिंचन विभागाचे असतांनाही पाणी संस्था गठीत केलेली नाही व त्याचे खापर गावकºयांच्या माथी मारून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम सिंचन विभाग करीत आहे़ उपरोक्त नादुरुस्त उपसा सिंचन योजना दुरुस्त करुन देण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. यावर सदर योजना दुरुस्त केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही, उलट त्या तशाच पडून राहणार व त्यावरील खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, चंद्रपूर यांचे म्हणणे आहे़वास्तविक पाहता शेतकऱ्यांची जर मागणी नव्हती तर ११ उपसा सिंचन जिल्ह्यात बांधण्यात आले त्यावर केंद्र शासनाचे ३ कोटी ८५ लाख रूपये खर्च करण्यात आले. शेतकऱ्यांची मागणी नसतांना एवढा मोठा निधी कसा काय खर्च करण्यात आला. असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी संबधीत उपसा सिंचनाची चौकशी करण्याकरिता जिल्हा नियोजन अधिकारी व संबधीत सिंचाई विभागाचे अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात येईल, चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी काँगे्रसच्या शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान दिले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.