सहा वर्षे लोटली : पेसा अंतर्गत हळदवाही टोलाचे नामांतरण कराभाडभिडी : ४ मार्च २०१४ च्या अधिसूचनेनुसार पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील अनेक वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार आहे. चामोर्शी तालुकयातील हळदवाही ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या हळदवाही टोला या गावाच्या नामांतरणाचा प्रस्ताव गेल्या ६ वर्षांपासून धूळखात आहे. हळदवाही टोलाचे आनंदनगर असे नामांतरण करून या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी हळदवाही टोला येथील नागरिकांनी केली आहे. चामोर्शी तालुक्यातील हळदवाही ग्रामपंचायतींतर्गत हळदवाही टोला हे गाव येत असून २०११ च्या जनजगणनेुसार हळदवाही टोला या गावाची लोकसंख्या ६५० इतकी आहे. सदर गावाची खातेदार संख्या २५ असून जमिनीचे क्षेत्रफळ १७८.७७ हेक्टर आर एवढे आहे. हळदवाही टोला हे नाव केवळ हळदवाही गावाजवळ असल्याने पडले आहे. हळदवाही टोलाला गावाचा स्वतंत्र दर्जा मिळाला नसल्यामुळे हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावात पुरेशा प्रमाणात मुलभूत सोयीसुविधा नाही. या गावातील अनेक नागरिक शासकीय योजनांसापासून वंचित आहे. त्यामुळे या गावाचे आनंदनगर असे नामकरण करून या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात यावा, असा ठराव २७ जून २००८ रोजी पारित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. सर्व सोपस्कार पार पाडूनही सदर नामांतरणाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात धूळखात पडला आहे. सदर प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नामांतरणाचा प्रस्ताव धूळ खात
By admin | Updated: July 17, 2014 00:05 IST