शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

प्राणहिता नदीवरील दारू दुकाने हटवा

By admin | Updated: November 14, 2015 01:31 IST

तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी,..

अमोल मुक्कावार यांची मागणी : कागजनगरच्या आमदारांशी चर्चा करून दिले निवेदन अहेरी : तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी, अशी मागणी अहेरी नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी तेलंगणाचे आ. कानेरू कोनप्पा यांना निवेदन देऊन केली आहे. या समस्येसंदर्भात मुक्कावार यांनी कोनप्पा यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली.ंअहेरी-गुडेम पुलाबाबत चर्चा करण्यासाठी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आ. कोनप्पा हे अहेरी येथे आले होते. यावेळी अमोल मुक्कावार यांनी कोनप्पा यांना निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान अमोल मुक्कावार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दशकापेक्षा अधिक कालावधीपासून दारूबंदी आहे. याचा गैरफायदा उचलण्यासाठी तेलंगणा राज्यातील काही दारू दुकानदारांनी दारूची दुकाने प्राणहिता नदीच्या काठावर स्थापन केली आहेत. या दारू दुकानांमध्ये तेलंगणा राज्यातील फारसे ग्राहक येत नाही. मात्र या दुकानांमधून नदी मार्गे दारूची वाहतूक अहेरी तालुक्यात केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा अहेरी तालुक्यात काहीच परिणाम दिसत नाही. यामुळे दारू दुकानदार व अहेरीतील दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी सामान्य नागरिकांचे कुटुंब मात्र रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेलंगणा राज्याने याबाबीची दखल घेऊन नदीपासून ४० किमीच्या अंतरात दारूची दुकाने थाटण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)वांगेपल्ली पुलानंतर अहेरीतील दारूबंदीवर परिणामतेलंगणा राज्य शासनाने पुढाकार घेत प्राणहिता नदीवर पूल बांधकामासाठी सुमारे ९५ कोटी रूपये मंजूर केल आहेत. या पुलाचे बांधकामाची निविदाही काढण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात प्राणहिता नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर दारूची दुकाने थाटली आहेत. या दुकानातील दारू सध्य:स्थितीत नदीद्वारे आणली जात आहे. नदीतून दारू आणताना अनेक अडचणींचा सामना दारूविक्रेत्यांना करावा लागत आहे. त्यामुळे दारूच्या वाहतुकीवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली पुलाची निर्मिती झाल्यानंतर पुलावरून खुलेआम दारू आणली जाईल. त्याचबरोबर अहेरी परिसरातील नागरिकांनाही तेलंगणा राज्यात दारू पिण्यासाठी जाणे सोयीचे होणार आहे. परिणामी या पुलामुळे अहेरी व परिसरात आणखी दारूचे लोट वाहणार आहेत. त्यामुळे नदीपुलाच्या निर्मितीपूर्वीच दारूची दुकाने हटविणे गरजेचे आहे.