शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

प्राणहिता नदीवरील दारू दुकाने हटवा

By admin | Updated: November 14, 2015 01:31 IST

तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी,..

अमोल मुक्कावार यांची मागणी : कागजनगरच्या आमदारांशी चर्चा करून दिले निवेदन अहेरी : तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी, अशी मागणी अहेरी नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी तेलंगणाचे आ. कानेरू कोनप्पा यांना निवेदन देऊन केली आहे. या समस्येसंदर्भात मुक्कावार यांनी कोनप्पा यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली.ंअहेरी-गुडेम पुलाबाबत चर्चा करण्यासाठी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आ. कोनप्पा हे अहेरी येथे आले होते. यावेळी अमोल मुक्कावार यांनी कोनप्पा यांना निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान अमोल मुक्कावार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दशकापेक्षा अधिक कालावधीपासून दारूबंदी आहे. याचा गैरफायदा उचलण्यासाठी तेलंगणा राज्यातील काही दारू दुकानदारांनी दारूची दुकाने प्राणहिता नदीच्या काठावर स्थापन केली आहेत. या दारू दुकानांमध्ये तेलंगणा राज्यातील फारसे ग्राहक येत नाही. मात्र या दुकानांमधून नदी मार्गे दारूची वाहतूक अहेरी तालुक्यात केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा अहेरी तालुक्यात काहीच परिणाम दिसत नाही. यामुळे दारू दुकानदार व अहेरीतील दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी सामान्य नागरिकांचे कुटुंब मात्र रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेलंगणा राज्याने याबाबीची दखल घेऊन नदीपासून ४० किमीच्या अंतरात दारूची दुकाने थाटण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)वांगेपल्ली पुलानंतर अहेरीतील दारूबंदीवर परिणामतेलंगणा राज्य शासनाने पुढाकार घेत प्राणहिता नदीवर पूल बांधकामासाठी सुमारे ९५ कोटी रूपये मंजूर केल आहेत. या पुलाचे बांधकामाची निविदाही काढण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात प्राणहिता नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर दारूची दुकाने थाटली आहेत. या दुकानातील दारू सध्य:स्थितीत नदीद्वारे आणली जात आहे. नदीतून दारू आणताना अनेक अडचणींचा सामना दारूविक्रेत्यांना करावा लागत आहे. त्यामुळे दारूच्या वाहतुकीवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली पुलाची निर्मिती झाल्यानंतर पुलावरून खुलेआम दारू आणली जाईल. त्याचबरोबर अहेरी परिसरातील नागरिकांनाही तेलंगणा राज्यात दारू पिण्यासाठी जाणे सोयीचे होणार आहे. परिणामी या पुलामुळे अहेरी व परिसरात आणखी दारूचे लोट वाहणार आहेत. त्यामुळे नदीपुलाच्या निर्मितीपूर्वीच दारूची दुकाने हटविणे गरजेचे आहे.