शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विसापूर भागातील पाणीटंचाई दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:30 IST

स्थानिक नगर पालिकेच्या विसापूर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : पाण्याच्या टाकीसाठी २ कोटी १६ लाखांचा निधी प्राप्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या विसापूर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. यासंदर्भात पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने विसापूर भागात पाणी टाकीचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी प्रदान केली असून याकरिता गडचिरोली नगर पालिकेला २ कोटी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने सदर काम सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.यासंदर्भात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०१७-१८ यावर्षाकरिता राज्यातील अनेक नगर परिषदांना राज्य शासनाने एकूण ३१०.४२ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार गडचिरोली नगर पालिकेला विसापूर भागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी २ कोटी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने या निधीतून जवळपास तीन ते चार लाख लीटर क्षमतेच्या टाकी बांधकामाचा नियोजन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. सदर पाणीटाकी उभारल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी नळ पाईपलाईन टाकून या टाकीच्या माध्यमातून विसापूर, एलआयसी कॉलनी, सोनापूर कॉम्प्लेक्स तसेच तिरूपती बालाजी मंदिर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.एकमेव वॉर्डात टँकरने होतो पाणीपुरवठादरवर्षी उन्हाळ्यात वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड खालावत असते. त्यात विसापूर हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. नळाला पाणी येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने या एकमेव वॉॅर्डात टँकद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र पाणी टाकी मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक संजय मेश्राम यांनी शासन व प्रशासनाकडे अनेकदा केली होती.वाढीव पाईपलाईनसाठी ५६ लाख मिळालेगडचिरोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या चारही दिशेला नव्याने वस्ती होत आहे. अनेक ठिकाणी भूखंड तयार केले जात असून ते विकले जात आहेत. मात्र नव्या वस्तींमध्ये पालिकेतर्फे पुरविण्यात येणारे नळाचे पाणी अद्यापही पोहोचले नाही. वाढीव पाईपलाईनसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पदाधिकारी व प्रशासनाने केली होती. याची दखल घेत राज्य शासनाने गडचिरोली शहरात आवश्यक त्या ठिकाणी वाढीव नळ पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.विसापूर भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण शासनाकडे पाणी टाकीच्या कामासाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा योगीता प्रमोद पिपरे व आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यांनी आमच्या पाठपुराव्याची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिला आहे.- केशव निंबोड, पाणीपुरवठा सभापती,नगर परिषद, गडचिरोली