शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

पावसाच्या भरवशावरील धान पऱ्हे करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेती पाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सुध्दा फुसका बार राहिला व नेहमीच हुलकावणी देणारा पाऊस अशी ख्याती असणाऱ्या पुनर्वसुही हुलकावण्या देऊन गेला.

ठळक मुद्देनाले व तलाव कोरडेच : पावसाअभावी धान पीक रोवणीस प्रारंभच नाही, शेतकरी सापडला विवंचनेत

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : पावसाच्या पाण्यावर १०० टक्के अवलंबून असणाऱ्या व उंच भागातील (वरटेकरी) शेतातील धान पऱ्हे रोवणीयोग्य झाली आहेत. महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही गेल्या १२-१३ दिवसांपासून पाऊस बरसत नसल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतजमीन कोरडे दिसून येत आहे. शिवाय धानाचे पऱ्हे पाण्याअभावी पिवळे पडून करपत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्या शेतकऱ्यांकडून सिंचन विहीर, मोटारपंप, ऑईल इंजिन व इतर सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांची धान रोवणी लगबगीने आटोपून घेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अलंबवून आहे, अशा शेतात पाणी नसल्याने शेतजमीन कोरडी पडली आहे.पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेतीपाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सुध्दा फुसका बार राहिला व नेहमीच हुलकावणी देणारा पाऊस अशी ख्याती असणाऱ्या पुनर्वसुही हुलकावण्या देऊन गेला. विशेष म्हणजे पुनर्वसुच्या पहिल्या दिवशी पडलेल्या दमदार पावसाने रोवणी सुरू झाली. परंतु ज्या शेतात वा शेतालगत जलस्त्रोत आहेत तसेच खोलगट, सखल भागात पाणी साचले अशाच शेतामधील रोवणी झाली व आताही सुरू आहे.दोन आठवड्यापासून रोवणीसाठी पाऊस पडतच नाही त्यामुळे उंच, टेकडी भागातील शेतातील धान पऱ्हे पिवळे पडू लागले आहेत. विहीरगाव येथील शिवारातल्या शेतातील पऱ्हे पिवळे पडले. जमीन पाण्याविना कोरडी पडली आहे. त्यामुळे पिवळे पडलेले वाफे करपण्याच्या मार्गावर आहेत. धान पेरून महिनाभराचा कालावधी झाला आहे. पऱ्ह्यांना ४० दिवस झाले आहेत. पºहे रोवणीयोग्य झाले आहेत. परंतु पाऊस नाही, पाणी नाही. परिणामी शेतकरी चिंतातूर झाले आहेत.विसोराच्या आसपास इटियाडोह कालव्याचे, गाढवी नदीचे पाणी पोहोचत असल्यामुळे रोवणी सुरू आहे. दुसरीकडे वरच्या पाण्यावर पिकणाऱ्या शेतातील पऱ्हे पाणी नसल्याने करपत आहेत. जमीन दगडासमान कडक होत आहे. शेतकरी पेचात सापडला आहे.पेरणी पूर्व मशागत ते पेरणी पर्यंतचा सर्व खर्च वाया जाऊन शेती तोट्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता धान पीक पºहे रोवणीची झाली आहेत. त्यामुळे येत्या आठवडा भरात पाऊस आल्यास पऱ्हे रोवणीला सुयोग्य राहतील. या कालावधीनंतर पाऊस न आल्यास पऱ्हे करपून शेती धानपीकाशिवाय रिकामी राहील. परिणामी पाऊस न झाल्यास शेती अडचणीत येणार आहे.पुष्य नक्षत्रावर भिस्तयंदा सुरुवातीच्या तीनही नक्षत्रात थोडाफार पाऊस झाला. आज तिसरा नक्षत्र पूनर्वसू संपला व पुष्य नक्षत्र सुरू झाला. गाढव वाहनाचा पुष्य कुठे जास्त, कुठे कमी असा स्वरूपाचा असल्याने आता रोवणीची कामे अजूनही सुरू न झालेल्या धान शेतीची सारी भिस्त याच नक्षत्रावर आहे. पाऊस पडत नसल्यामुळे पाणी देऊन रोवणी पूर्ण केलेल्या शेताच्या पिकांची स्थितीसुद्धा धोक्याची ठरू शकते.अर्धवटच रोवणीकसारी येथील मोठ्या तलावाच्या खालील एका शेतात तर एक विचित्र परिस्थिती दिसून आलेली आहे. त्या शेतामध्ये विहीर आहे, सौरऊर्जा पंप असून जेव्हापर्यंत विहिरींमध्ये पाणी होते त्या पाण्यावर एकाच शेतातील अर्ध्या जमिनीवर रोवणी झाली आहे तर अर्ध्या जमिनीवर विहिरीमध्ये पाणी नसल्याने जमीन कोरडी पडली आहे. रोवणीसाठीचे पऱ्हे पावसाअभावी करपत आहेत. याच शेतातील पाण्याविना कोरड्या पडलेल्या एका बांधीमध्ये रोवणीला चिखलणी करण्यासाठी एक लाकडी फण ठेवले आहे. आणि रोवणी करून उरलेला अर्धा धान वाफा सुद्धा दिसत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती