शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

तीन पिढ्यांची अट शिथील करा

By admin | Updated: September 15, 2016 02:04 IST

नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला.

अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या : एटापल्ली तालुक्यातील नागरिकांची पालकमंत्री व खासदारांकडे मागणीएटापल्ली : नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. परंतु तीन पिढ्यांच्या अटीचे कारण दाखवून शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व खा. अशोक नेते यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, सरखेडा, कसनसूर, कसुरवाही, वडसा (खुर्द), वडसा कला, कुरूमवाडा, वेडमागड, सोहगाव, हनपायली, ईरपनपायली, मोरावाही टेक्का, कोहका, पेंदूलवाही, जव्हेली, सिरपूर, कोकोबंडा, रोप्पी, कारका येथील शेतकरी मागील ४० ते ५० वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करीत आहेत. वास्तव्यापासूनच वन जमिनीवर अतिक्रमण करून उपजीविका करीत आहेत. याची नोंद महसूल विभागाकडे आहे. वनहक्क कायदा अधिनियम २००६ नुसार अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी २००८ पासून वनहक्क दाव्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करून तत्काळ वनहक्क पट्टे वितरित करावे, अशी मागणी जि. प. सदस्य बाजीराव कुमरे, पं. स. सदस्य सपना कोडापे, हरिदास टेकाम, देवनाथ सोनुले, मल्लाजी येनगंटीवार, इब्राहिम पठाण, बुधाजी गुरनुले, केशव पेदापल्लीवार, संपत चौधरी, विश्वनाथ सोनुले, देवाजी गुरनुले, तुकाराम वाटगुरे, श्रीहरी गुरनुले, कवडू गुरनुले, सावंत गुरनुले, मनिराम भोयर, मारोती वाटबरे, किसन कांबळे, श्रावण कांबळे, सोनुले यांनी केली आहे.