अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या : एटापल्ली तालुक्यातील नागरिकांची पालकमंत्री व खासदारांकडे मागणीएटापल्ली : नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. परंतु तीन पिढ्यांच्या अटीचे कारण दाखवून शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व खा. अशोक नेते यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, सरखेडा, कसनसूर, कसुरवाही, वडसा (खुर्द), वडसा कला, कुरूमवाडा, वेडमागड, सोहगाव, हनपायली, ईरपनपायली, मोरावाही टेक्का, कोहका, पेंदूलवाही, जव्हेली, सिरपूर, कोकोबंडा, रोप्पी, कारका येथील शेतकरी मागील ४० ते ५० वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करीत आहेत. वास्तव्यापासूनच वन जमिनीवर अतिक्रमण करून उपजीविका करीत आहेत. याची नोंद महसूल विभागाकडे आहे. वनहक्क कायदा अधिनियम २००६ नुसार अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी २००८ पासून वनहक्क दाव्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करून तत्काळ वनहक्क पट्टे वितरित करावे, अशी मागणी जि. प. सदस्य बाजीराव कुमरे, पं. स. सदस्य सपना कोडापे, हरिदास टेकाम, देवनाथ सोनुले, मल्लाजी येनगंटीवार, इब्राहिम पठाण, बुधाजी गुरनुले, केशव पेदापल्लीवार, संपत चौधरी, विश्वनाथ सोनुले, देवाजी गुरनुले, तुकाराम वाटगुरे, श्रीहरी गुरनुले, कवडू गुरनुले, सावंत गुरनुले, मनिराम भोयर, मारोती वाटबरे, किसन कांबळे, श्रावण कांबळे, सोनुले यांनी केली आहे.
तीन पिढ्यांची अट शिथील करा
By admin | Updated: September 15, 2016 02:04 IST