शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

तीन पिढ्यांची अट शिथील करा

By admin | Updated: September 15, 2016 02:04 IST

नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला.

अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या : एटापल्ली तालुक्यातील नागरिकांची पालकमंत्री व खासदारांकडे मागणीएटापल्ली : नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. परंतु तीन पिढ्यांच्या अटीचे कारण दाखवून शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व खा. अशोक नेते यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, सरखेडा, कसनसूर, कसुरवाही, वडसा (खुर्द), वडसा कला, कुरूमवाडा, वेडमागड, सोहगाव, हनपायली, ईरपनपायली, मोरावाही टेक्का, कोहका, पेंदूलवाही, जव्हेली, सिरपूर, कोकोबंडा, रोप्पी, कारका येथील शेतकरी मागील ४० ते ५० वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करीत आहेत. वास्तव्यापासूनच वन जमिनीवर अतिक्रमण करून उपजीविका करीत आहेत. याची नोंद महसूल विभागाकडे आहे. वनहक्क कायदा अधिनियम २००६ नुसार अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी २००८ पासून वनहक्क दाव्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करून तत्काळ वनहक्क पट्टे वितरित करावे, अशी मागणी जि. प. सदस्य बाजीराव कुमरे, पं. स. सदस्य सपना कोडापे, हरिदास टेकाम, देवनाथ सोनुले, मल्लाजी येनगंटीवार, इब्राहिम पठाण, बुधाजी गुरनुले, केशव पेदापल्लीवार, संपत चौधरी, विश्वनाथ सोनुले, देवाजी गुरनुले, तुकाराम वाटगुरे, श्रीहरी गुरनुले, कवडू गुरनुले, सावंत गुरनुले, मनिराम भोयर, मारोती वाटबरे, किसन कांबळे, श्रावण कांबळे, सोनुले यांनी केली आहे.