शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही नातेवाईकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

बहुतांश मृतांचे नातेवाईक काेराेनाचे नियम पाळत अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्काराचे साेपस्कारही पार पाडतात. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील, पण काेराेनाच्या आजाराने मृत्यू हाेणे किती क्लेषदायक आहे, हेच यातून सिद्ध हाेतआहे. 

ठळक मुद्देकाेराेनाने मृत्यू झालेल्यांची अशीही व्यथा, गडचिराेली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच पार पाडले साेपस्कार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाने माणसाला माणसापासूनच दूर केले आहे. काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा पिच्छा तर मरणानंतरही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. काेराेनाने मृत्यू झालेल्या सहा रुग्णांच्या नातेवाईकांनी आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करणार नाही, असे स्पष्टपणे लिहून दिले. त्यामुळे गडचिराेली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच त्या सहा मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली.अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता यावे, यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे अंत्यविधीला लग्न समारंभाप्रमाणेच गर्दी उसळते. पण काेराेनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास संसर्ग टाळण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र मृत व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे साेपस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानी दिली जाते. बहुतांश मृतांचे नातेवाईक काेराेनाचे नियम पाळत अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्काराचे साेपस्कारही पार पाडतात. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील, पण काेराेनाच्या आजाराने मृत्यू हाेणे किती क्लेषदायक आहे, हेच यातून सिद्ध हाेतआहे. अंत्यविधीला आम्ही उपस्थित राहू शकत नाही, तुम्हीच अंत्यविधी पार पाडावे, असे संमतीपत्र लिहून देताना नातेवाईकांना किती दु:ख झाले असावे हे तेच सांगू शकतात.

अशी केली जाते अंत्यविधीची प्रकियाकाेराेनामुळे मृत्यू झाल्यास याबाबतची माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनामार्फत दिली जाते. अंत्यविधीच्या माध्यमातून इतर नागरिकांमध्ये काेराेनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र पाच नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. नगर परिषदेच्या शववाहिकेने मृतदेह स्मशानघाटापर्यंत पाेहाेचविल्या जाते. दाेन नातेवाईक पीपीई किट घालून अंत्यविधीचे सर्व साेपस्कार पार पाडतात. नातेवाईक जर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसतील तर याबाबत त्यांना आराेग्य विभागाकडे तसे लेखी लिहून द्यावे लागते. ही बाब नगर परिषदेला कळविली जाते व नगर परिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. नातेवाईकांनी लेखी लिहून न दिल्यास संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवपेटीत ठेवून दाेन ते तीन दिवस नातेवाईकांची प्रतीक्षा केली जाते. त्यानंतरही नातेवाईक न आल्यास रुग्णालय प्रशासन पाेलीस स्टेशन व नगर परिषदेला कळविते. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू