शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'अपने ही लोग है, गोली मत चलावें'; माओवाद्यांकडून युद्धविरामाचा पुनरुच्चार

By संजय तिपाले | Updated: April 10, 2025 21:25 IST

चेंडू पुन्हा सरकारच्या कोर्टात

संजय तिपाले, गडचिरोली : छत्तीसगडसह महाराष्ट्रात  धडक मोहिमा राबविल्याने धडकी भरलेल्या माओवाद्यांनी २८ मार्च रोजी तेलुगुमधून पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. आधी शस्त्रे टाका व आत्मसमर्पण करा, अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर हादरलेल्या माओवाद्यांचे ८ एप्रिल रोजीचे एक पत्रक १० एप्रिल रोजी समोर आले असून त्यात युध्दविरामाचा पुनउर्च्चार केला आहे.   जवानांना उद्देशून 'अपने ही लोग है, गोली मत चलावें' अशी विनंती करतानाच  बस्तरमधील मोहिमा थांबवून अनुकूल वातावरण बनवावे व  शांतीवार्ता करावी  , असे नमूद करुन माओवाद्यांनी युध्दविरामाचा चेंडू सरकारकडे टोलविला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यानुसार, गेल्या १५ महिन्यांत ४०० हून अधिक माओवाद्यांना ठार करुन जवानांनी सळो की पळो करुन सोडले आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड  या राज्यात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, ८ एप्रिल रोजी उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याचे पत्रक समोर आले आहे. त्यात शांतीवार्तासाठी आम्ही तयार आहोत, पण त्यासाठी अनुकूल वातावरण गरजेचे आहे, अशी भूमिका मांडली आहे.

ही सरकारची जबाबदारी...

पत्रकात म्हटले आहे की, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी युध्दविरामाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरणाची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र, आत्मसमर्पण हे सगळ्या समस्यांचे उत्तर नाही, यावरुन असे दिसते की सरकारला माओवादविरोधी मोहिमा यापुढेही राबवायच्या आहेत. मात्र, कारवाया थांबविल्या, वातावरण अनुकूल झाले तरच शांतीवार्ता करता येईल, ही सरकारची जबाबदारी आहे.रेशन, वीज, पाणी, आरोग्य सुविधांना विरोध नाही

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात ३१ मार्चला रेणुका उर्फ बानू या महिला माओवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. याचा उल्लेख पत्रकात असून ती प्रतिकूल परिस्थितीतही लढत राहिल्याचे म्हटले आहे. आम्हाला जनताविरोधी ठरवले जात आहे. मात्र, शाळा, अंगणवाडी, दवाखाना, रेशन, पाणी व वीज या मूलभूत बाबींना कधी विरोध केलेला नाही. एक- दोन विषयांत घाईघाईने चुका झाल्या, त्यानंतर आम्ही माफी मागितल्याचाही उल्लेख पत्रकात आहे.

पत्रक पाहिले आहे. मात्र, माओवाद्यांनी आत्मसमर्पण करणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांनी हिंसेची वाट सोडावी व आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्गाने आपले उर्वरित जीवन सुखकर करावे. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली  

टॅग्स :naxaliteनक्षलवादी