शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावांचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: March 6, 2015 01:31 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी ...

गडचिरोली : गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी लोकसंख्येचे गाव आहेत. या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. परंतु ही योजना अद्यापही मूर्तरूप घेऊ शकलेली नाही. त्यामुळे ही गावे सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे. व प्रशासनाही येथे विज, पाणी, रस्ते आदी पोहचविण्यात अडचणी येत आहेत.गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड मोठा आहे. जवळजवळ ४२० किलोमिटरच्या परीघात या जिल्ह्यातील १२ तालुके येतात. यातील कोरची व भामरागड हे छत्तीसगड सीमेवरचे संवेदनशील तालुके आहेत. या तालुक्यात अनेक गावे ही दीडशे दोनशे वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येची आहे. या गावात जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही कधी जात नाही. येथील जनतेला अजूनही मुलभूत सोयीसुविधा प्रशासनाला पोहचविता आल्या नाही. एकच नाला किमान पाच ते सात वेळा ओलांडून या गावात पायी जावे लागते. भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. कोरची तालुक्यात १३३ गावे आहेत. यातील किमान ३० ते ४० गावातील नागरिकांपर्यंत वीज, पाणी अजुनही पोहचलेले नाही. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातील सात ते आठ गावांमध्ये केवळ सरकारच्या शाळा व ग्रामपंचायतीच सुरू होऊ शकल्या. बाकी सोयीसुविधांचा पत्ताही नाही. जिल्ह्यातील अशा गावांची आकडेवारी तयार करून या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात आणून वसविण्याची योजना प्रशासनाने तयार केली होती. तालुका मुख्यालयात आणल्यावर तेथे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरचा भारही बराचसा हलका होणार होता. शिवाय सर्व नागरिकांना सोयीसुविधाही देणे शक्य होणार होते. परंतु या भागातील नागरिक या पुनर्वसनासाठी राजी झाले नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आहे.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काही दिवसांपूर्वी लहान गावातील आश्रमशाळा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर अंमलबजावणी झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यात अनेक गाव नक्षली दहशतीच्या छायेत आहे. या गावातील सधन नागरिकांनी गाव सोडून तालुका मुख्यालयात घर बांधले आहे. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. मात्र दारिद्र्य रेषेखालील लोक गावातच राहतात. (प्रतिनिधी)