शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तिवेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:00 IST

वृद्धापकाळातील परवड थांबणार : सोयी-सुविधांमुळे गरीब, कष्टकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा कामगार कल्याण मंत्रालयाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी अजूनपर्यंत याबाबत शासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या योजनेमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत मिळणार आहे.

बांधकाम कामगारांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे होऊ शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. वृद्धापकाळात बांधकाम कामगारांची परवड होऊ नये यासाठी त्यांना निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कामगारांना सदर निर्णयाची अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. याकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात दरवर्षी कामगारांची नोंदणी वाढत आहे.

नोंदणी कशी करणार?इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाइटला भेट देऊन तेथे आवश्यक माहिती भरावी, तसेच कागदपत्रे अपलोड करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येते. सेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी.

केव्हा, किती मिळणार लाभ ?बांधकाम कामगारांना ६० वर्षे वयानंतर निवृत्तिवेतन मिळणार आहे. कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तिवेतन दिले जाणार आहे.

कामगारांना अन्य लाभ काय?कामगारांना सुरक्षा पेटी संच तसेच किचन संचाचा लाभ दिला जातो. याशिवाय विविध योजनांचा लाभ दिला जातो. या लाभांमध्ये घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अपघात विम्याचा लाभ व अन्य योजनांचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तिवेतनइमारत बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा. 

४६ हजार जिल्ह्यात १३ हजारांवर सक्रीय कामगार आहेतबांधकाम कामगारांची नोंदणी आहे. दरवर्षी नोंदणी संख्या वाढत आहे. सुरक्षा किट, किचन संच व विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने अनेकजण नोंदणी करतात.

कालावधीनुसार मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभकामगारांना १० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५० टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी ६ हजार, १५ वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्के मर्यादेत प्रतिवर्षी ९ हजार निवृत्तिवेतन दिले जाईल. २० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPensionनिवृत्ती वेतन