शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केवळ ४२ प्रस्तावाला पोलीस विभागाकडून शिफारस

By admin | Updated: September 6, 2016 00:52 IST

राज्याच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत सन २०१५ पासून...

नक्षल गावबंदी योजना : ५०३ प्रस्ताव थंडबस्त्यातगडचिरोली : राज्याच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत सन २०१५ पासून ३० आॅगस्ट २०१६ पर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने आदिवासी ३९२ व गैरआदिवासी १५३ अशा एकूण ५४५ गावांचे प्रस्ताव सादर केले. यापैकी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने नक्षल गावबंदी योजनेच्या केवळ ४२ प्रस्तावांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उर्वरित ५०३ गावांचे प्रस्ताव थंडबस्त्यात आहेत.जिल्हा पोलीस विभागाने नक्षल गावबंदी योजनेंतर्गत ४२ गावांच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ३४ आदिवासी व आठ गैरआदिवासी गावांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. नक्षल गावबंदी योजनेंतर्गत गावांनी ग्रामपंचायत व ग्रामसभेचा ठराव पारित करून नक्षलवाद्यांना गावबंदी केली. अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने सदर ठराव जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडे संबंधित गावांनी सादर केले. मात्र शासन व प्रशासकीय दिरंगाईमुळे तब्बल ५०३ गावे शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. आदिवासी विकास विभागाने सन २००३ पासून आदिवासी गावांसाठी तर गृह विभागाने नक्षलग्रस्त आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील गैरआदिवासी गावांसाठी सन २०१०-११ या वर्षापासून नक्षल गावबंदी योजना सुरू केली. नक्षल गावबंदी योजनेंतर्गत नक्षल गावबंदी केलेल्या संबंधित गावांना विकासात्मक कामासाठी तीन लाख रूपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान शासनाकडून दिले जाते. सदर प्रोत्साहनात्मक निधी संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत वितरित करण्याची तरतूदही या योजनेच्या शासन निर्णयात नमूद आहे. सदर प्रोत्साहनात्मक निधी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवून संबंधित यंत्रणेला वितरित करण्यात येतो. मात्र गेल्या वर्षभरापासून या योजनेचा प्रोत्साहनात्मक निधी संबंधित गावांना न मिळाल्याने त्या गावातील विकासकामांना खिळ बसली आहे.