गडचिरोली : शालेय पुस्तकांच्या वाचनासह अवांतर वाचनाला अनन्यसाधारण महत्व आहे. पुस्तक वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात. प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कविता यातून आपल्या जीवनाला नवी दिशा दिली, असा सूर गं्रथोत्सवात आयोजित ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावरील विवेचनात विद्यार्थ्यांनी काढला. संत ज्ञानेश्वर नगरीत शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पूजा चिंंचोळकर, दामिनी नैताम, रिद्धी पंचभाई, समशेर खॉ पठाण, अरविंद भैसारे, गौतम डांगे, राकेश चडगुलवार आदी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. दरम्यान प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ४ गटात विभागणी करण्यात आली होती. यावेळी ग्रंथ साहेब गट विजेता ठरला. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले पदार्थ मेळाव्यात ठेवण्यात आले होते. मंगळवारी एकल, समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोगाव, धानोरा, आरमोरी, गिरोला, भेंडाळा, खरपुंडी, आंबेशिवणी, मुरखळा येथील विद्यार्थ्यांनी तसेच भगवंतराव अध्यापक विद्यालय, जे. टी. पाटील अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
वाचनाने जीवनाला दिली दिशा
By admin | Updated: January 7, 2015 22:53 IST