शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वन्यजीव प्रगणनेत आढळल्या दुर्मीळ रानम्हशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:53 IST

वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.

ठळक मुद्देकोलामार्का संवर्धन क्षेत्र : रानम्हशींची संख्या २८ च्या वर असल्याचा वन विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.कमलापूर वन परिक्षेत्रातील १४० वर्ग किलोमीटरच्या परिसरात रानम्हशींच्या संवर्धनासाठी सन २०१२ मध्ये कोलामार्का संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी याठिकाणी केवळ १२ रानम्हशी होत्या. या म्हशी दुर्मीळ असल्याने त्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वन विभागाने विविध उपाययोजना केल्या. या म्हशींची शिकार होणार नाही. यासाठी खबरदारी घेतली. जंगलामध्ये छोटे-मोठे पाणवटे, खोदतळे तयार करून त्यांना पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या परिसरात रानम्हशींची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सद्यस्थितीत २८ च्या वर रानम्हशींचे अस्तित्त्व असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या ठिकाणीसुद्धा या म्हशींचे आवागमन सुरू राहते. कमलापूर परिसरात घनदाट जंगल आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध असल्याने रानम्हशींच्या आरोग्यासाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. ही बाब लक्षात घेऊनच रानम्हशी संवर्धन क्षेत्र म्हणून या परिसराला घोषित करण्यात आले आहे. कोलामार्का संवर्धन क्षेत्रात रानम्हशींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी रानम्हशींचे अस्तित्त्व वाढले आहे. त्यांची संख्या आणखी वाढण्यासाठी वन विभाग आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.