शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

मुलचेरात राकाँला ४६.८९ टक्के मते

By admin | Updated: November 11, 2015 00:49 IST

नऊ नगर पंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने प्रचंड यश मिळविले आहे.

११ जागा मिळाल्या : १०९२ पैकी राकाँच्या वाट्याला ५११ मतदानगडचिरोली : नऊ नगर पंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने प्रचंड यश मिळविले आहे. येथे झालेल्या मतदानात ४६.८९ टक्के मते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडली. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी हा चमत्कार निवडणुकीत घडवून आणला आहे.मुलचेरा हा अहेरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेला तालुका आहे. बंगाली भाषिक लोकांची वस्ती अधिक असलेल्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायम प्राबल्य राहत आले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राकाँचा हा गड काहीसा ढासळला होता. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मुलचेरा तालुक्याच्या शांतिग्राम मतदार संघातून निवडून आलेले परशुराम कुत्तरमारे विराजमान झाल्यावर त्यांनी या भागातील पक्ष संघटनेवरही लक्ष केंद्रीत केले. नगर पंचायत निवडणुका घोषित झाल्यावर मुलचेरावर काँग्रेससह भाजप, आविसंनही लक्ष घातले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात मुलचेरा नगर पंचायतीवर राकाँची एकहाती सत्ता कायम राखली आहे. येथे १ हजार ९२ मतदारांनी १७ प्रभागात मतदान केले. त्यापैकी ५११ मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. राकाँला येथे ११ जागांवर विजय मिळविता आला. प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला २५ मते मिळाली. तेथे भाजपच्या विजयी उमेदवाराला ४६ मते आहे. तर प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हनमंतू वेलादी तिसऱ्या क्रमांक राहिले. प्रभाग क्र. ९ व प्रभाग १२, प्रभाग क्र. १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारांना एकेरी मतदान झाले. तर प्रभाग क्र. १६ मध्ये राकाँचे नीरज नामदेवराव चापले एका मताने पराभूत झाले. एकूणच मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेली भरारीचे श्रेय अध्यक्ष कुत्तरमारे यांच्या खात्यातच जाणारे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)