शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राकाँची वन विभागावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:41 IST

वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम तसेच....

ठळक मुद्देधर्मरावबाबा आत्राम यांचे नेतृत्व : वनपट्ट्यांचे वितरण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाºया नागरिकांना तत्काळ जमिनीचे पट्टे वाटप करावे, गैरआदिवासी शेतकºयांना वनजमिनीच्या पट्ट्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, वनविभागाची कामे करताना स्थानिक मजुरांना प्राधान्य द्यावे, मजुरांची थकीत मजुरी तत्काळ द्यावी, अगरबत्ती प्रकल्पात काम करणाºया महिलांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावे, वनविभागामार्फत करण्यात येणारी रोपवाटिका, थिनींग, लॉगिंग व अन्य कामे पूर्ववत सुरु करावी, सुरजागड लोहप्रकल्पाची विस्तृत माहिती द्यावी, सुरजागड पहाडावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची माहिती द्यावी, भामरागड, सिरोंचा व आलापल्ली वनविभागातील तेंदू मजुरांची बोनसची रक्कम तत्काळ अदा करावी, खसरा डेपोत जळाऊ लाकडे व बांबू उपलब्ध करुन द्यावे, वनकर्मचाºयांना वेतनवाढ द्यावी, तसेच रोजंदारी कर्मचाºयांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपवनसंरक्षक तांबे यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, कैलास कोरेत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सुकडू कोरेत, पंचायत समिती सदस्य प्रांजली शेंबळकर, आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे, ग्रा.पं. सदस्य सतीश आत्राम, माजी सरपंच रेणुका कुळमेथे, अर्चना कोडापे, वासुदेव पेद्दीवार, स्वामी वेलादी, अल्ताफ पठाण, सत्यन्ना मेरगा, उमेश आत्राम, वशिल मोकाशी, प्रवीण तोटावार, रघु पांढरे, सोमेश्वर रामटेके, मुनेश्वर गुंडावार, संतोष गणपूरवार यांच्यासह अहेरी परिसरातील राष्टÑवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.