शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

नऊ तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:09 IST

शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.

ठळक मुद्देपावसाचा पुन्हा जोर । नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावांचे मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.बुधवारी पावसाने उसंत दिली होती. त्यानंतर पुन्हा गुरूवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात शनिवारी ७७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रोवणीच्या कामांना मात्र वेग आला आहे. ३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ७४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७७७ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ५७.३७ टक्के पाऊस झाला आहे. ६५ मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास अतिवृष्टी झाल्याचे समजले जाते. त्यानुसार गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.भागमरागडचा संपर्क तुटलेलाचभामरागड शहराजवळ असलेल्या पर्लकोटा नदीपुलावर शुक्रवारी सायंकाळी पाणी चढले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भामरागडचा संपर्क तुटलेलाच होता. छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस पडल्याने इंद्रावती नदीला पूर आला आहे. त्यामुळे पर्लकोटा व पामुलगौतम नदीला दाब निर्माण झाला आहे. परिमाणी पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. पुराचे पाणी वाढतच होते. ५० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इंद्रावती नदी गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. छत्तीसगड राज्यातही अतिवृष्टी झाल्याने इंद्रावती नदी धोक्याच्या पातळीच्यावर वाहत आहे. गोदावरी नदीलाही पूर आला आहे. तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणाचेही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठी व सकल भागात असलेल्या कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागट्टा, बोम्मेलकोंडा, सोमनूर ५० गावांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. वीज व मोबाईल सेवा खंडित होणार नाही.याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याने या दोन्ही सेवा सुरू आहेत.गोठा कोसळल्याने आष्टा येथील गाय ठारशनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टा येथील रामा श्रावण मोहुर्ले यांचा गोठा कोसळून एक गाय ठार झाली. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. तसेच घरातील काही वस्तू मातीत दबल्याने नुकसान झाले. यामध्ये जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आष्टा येथीलच रसिका विश्वनाथ कोकोडे यांचेही घर कोसळून स्वयंपाक घरातील वस्तू मातीत दबलेल्या आहेत. रसिका कोकोडे यांचे जवळपास १५ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सुखदेव शिम्पी यांनी पंचनामा केला. यावेळी डॉ. कापगते, माजी उपसरपंच प्रविण राहटे, उपसरपंच भारत वाटगुरे पंचनाम्याच्यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर