शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

नऊ तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:09 IST

शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.

ठळक मुद्देपावसाचा पुन्हा जोर । नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावांचे मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे.बुधवारी पावसाने उसंत दिली होती. त्यानंतर पुन्हा गुरूवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात शनिवारी ७७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रोवणीच्या कामांना मात्र वेग आला आहे. ३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ७४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७७७ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ५७.३७ टक्के पाऊस झाला आहे. ६५ मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास अतिवृष्टी झाल्याचे समजले जाते. त्यानुसार गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.भागमरागडचा संपर्क तुटलेलाचभामरागड शहराजवळ असलेल्या पर्लकोटा नदीपुलावर शुक्रवारी सायंकाळी पाणी चढले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भामरागडचा संपर्क तुटलेलाच होता. छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस पडल्याने इंद्रावती नदीला पूर आला आहे. त्यामुळे पर्लकोटा व पामुलगौतम नदीला दाब निर्माण झाला आहे. परिमाणी पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. पुराचे पाणी वाढतच होते. ५० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इंद्रावती नदी गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. छत्तीसगड राज्यातही अतिवृष्टी झाल्याने इंद्रावती नदी धोक्याच्या पातळीच्यावर वाहत आहे. गोदावरी नदीलाही पूर आला आहे. तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणाचेही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठी व सकल भागात असलेल्या कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागट्टा, बोम्मेलकोंडा, सोमनूर ५० गावांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. वीज व मोबाईल सेवा खंडित होणार नाही.याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याने या दोन्ही सेवा सुरू आहेत.गोठा कोसळल्याने आष्टा येथील गाय ठारशनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टा येथील रामा श्रावण मोहुर्ले यांचा गोठा कोसळून एक गाय ठार झाली. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. तसेच घरातील काही वस्तू मातीत दबल्याने नुकसान झाले. यामध्ये जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आष्टा येथीलच रसिका विश्वनाथ कोकोडे यांचेही घर कोसळून स्वयंपाक घरातील वस्तू मातीत दबलेल्या आहेत. रसिका कोकोडे यांचे जवळपास १५ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सुखदेव शिम्पी यांनी पंचनामा केला. यावेळी डॉ. कापगते, माजी उपसरपंच प्रविण राहटे, उपसरपंच भारत वाटगुरे पंचनाम्याच्यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर