शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पावसाने प्राणहितेचा जलस्तर वाढला

By admin | Updated: June 17, 2017 01:57 IST

गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या

वाहतूक बंद : पूल बांधकामावर परिणाम; पावसाळ्यात तेलंगणा-महाराष्ट्राचा संपर्क तुटणार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातही पाऊस झाला. पावसामुळे अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीचा जलस्तर अचानक वाढला. दरम्यान कच्च्या रस्त्याने सुरू असलेली वाहतूक दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक बंद झाली. जलस्तर वाढल्यामुळे प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे. पावसाळ्यात आणखी प्राणहिता नदीचा जलस्तर वाढून सदर मार्ग बंद होणार असल्याने महाराष्ट्र व तेलंगणाचा संपर्क तुटणार आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास पाऊस झाल्याने अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान पूल बांधकामासाठी वाहनेही नदीपात्रात होती. पायदळ तसेच दुचाकीने लोकांचे येथील कच्च्या मार्गावरून आवागमन सुरू होते. मात्र पावसाने अचानक जलस्तर वाढल्याने पूल बांधकामावरील सर्व वाहने महाराष्ट्राच्या सीमेकडे ठेवण्यात आली. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली आला आहे. पाण्याचा प्रवाह या नदीपात्रात वाढला आहे. अचानक प्राणहिता नदीचा जलस्तर वाढल्याने पूल बांधकामात अडचण निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेकडील पिलर उभारण्याचे बांधकाम सुरू आहे. जलस्तर वाढल्याने तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील वाहतूक थांबली आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास प्राणहिता नदीचा जलस्तर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दोन्ही राज्याचा संपर्क तुटणार असून नावेच्या साह्याने लोकांना प्रवास करावा लागणार आहे. प्रसंगावधान राखल्याने युवक बचावला अहेरी शहरातील एक युवक तेलंगणा राज्याच्या गुड्डेमकडून अहेरीकडे परत येत होता. गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान सदर युवकाचा नदीपात्रात तोल गेल्याने अर्ध्या किमीपर्यंत तो वाहत गेला. मात्र त्याने वेळीच प्रसंगावधान दाखवून नदीपात्रातील एका झाडास पकडले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सदर युवकाला छोट्या नावेने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेचा काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले असल्याची माहिती आहे. या नदीपात्राच्या परिसरात पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.