शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

पावसाने प्राणहितेचा जलस्तर वाढला

By admin | Updated: June 17, 2017 01:57 IST

गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या

वाहतूक बंद : पूल बांधकामावर परिणाम; पावसाळ्यात तेलंगणा-महाराष्ट्राचा संपर्क तुटणार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातही पाऊस झाला. पावसामुळे अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीचा जलस्तर अचानक वाढला. दरम्यान कच्च्या रस्त्याने सुरू असलेली वाहतूक दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक बंद झाली. जलस्तर वाढल्यामुळे प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे. पावसाळ्यात आणखी प्राणहिता नदीचा जलस्तर वाढून सदर मार्ग बंद होणार असल्याने महाराष्ट्र व तेलंगणाचा संपर्क तुटणार आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास पाऊस झाल्याने अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान पूल बांधकामासाठी वाहनेही नदीपात्रात होती. पायदळ तसेच दुचाकीने लोकांचे येथील कच्च्या मार्गावरून आवागमन सुरू होते. मात्र पावसाने अचानक जलस्तर वाढल्याने पूल बांधकामावरील सर्व वाहने महाराष्ट्राच्या सीमेकडे ठेवण्यात आली. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली आला आहे. पाण्याचा प्रवाह या नदीपात्रात वाढला आहे. अचानक प्राणहिता नदीचा जलस्तर वाढल्याने पूल बांधकामात अडचण निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेकडील पिलर उभारण्याचे बांधकाम सुरू आहे. जलस्तर वाढल्याने तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील वाहतूक थांबली आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास प्राणहिता नदीचा जलस्तर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दोन्ही राज्याचा संपर्क तुटणार असून नावेच्या साह्याने लोकांना प्रवास करावा लागणार आहे. प्रसंगावधान राखल्याने युवक बचावला अहेरी शहरातील एक युवक तेलंगणा राज्याच्या गुड्डेमकडून अहेरीकडे परत येत होता. गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान सदर युवकाचा नदीपात्रात तोल गेल्याने अर्ध्या किमीपर्यंत तो वाहत गेला. मात्र त्याने वेळीच प्रसंगावधान दाखवून नदीपात्रातील एका झाडास पकडले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सदर युवकाला छोट्या नावेने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेचा काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले असल्याची माहिती आहे. या नदीपात्राच्या परिसरात पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.