शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भागात पावसाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उचलण्यात आले आहेत. पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

ठळक मुद्देप्राणहिता व गाेदावरी नद्यांचे पाणी शिरले शेतात; कापूस, साेयाबिन, धानाचे नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा तडाखा ाजिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यांना बसला आहे. सिराेचा तालुक्यात प्राणहिता व गाेदावरी नदीच्या पुराने थैमान घातले आहे, तर एटापल्ली, भामरागड, चामाेर्शी तालुक्यांतील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उचलण्यात आले आहेत. पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. महागाव व टेकरा सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदी इशारा पातळीच्या खाली आहे.  मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ७९ गेट उघडलेले असून, २६ हजार ३२० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.  भामरागड सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी पर्लकाेटा पुलाच्या २.२० मीटरने खाली आहे.

झाड काेसळल्याने वाहतूक ठप्पचामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा- सगणपूर मार्गावर डॉ. मंडल यांच्या शेताजवळील झाड पावसामुळे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली हाेती. नागरिकांनी झाडाच्या फांद्या ताेडून रस्ता माेकळा केला.

गाेविंदपूर नाल्यावरील वाहतूक पुन्हा थांबलीगडचिराेली-चामाेर्शी या मुख्य मार्गावरील गाेविंदपूरजवळ असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजुने बनविलेल्या कच्च्या रस्त्यावरील तात्पुरता पूल पाण्याखाली आल्याने या मार्गावरची वाहतूक शनिवारी थांबविली हाेती.

सिराेंचा तालुक्याला पुराचा तडाखा

- सिराेंचा : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सिराेंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गाेदावरी व प्राणहिता या दाेन्ही नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी सखल भागात असलेल्या शेतीत शिरल्याने साेयाबीन, कापूस, मिरची व धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. - सिराेंचा तालुक्यातील  रेगुंठा, बामणी, रंगय्यापल्ली, अमरावती, कार्सपल्ली, सिरोंचा, नगरम, चिंतालपल्ली, आरडा, जानमपल्ली ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर वसली आहेत. प्राणहिता नदीचे पाणी सखल भागात असलेल्या शेतांमध्ये शिरले आहे. त्यामुळे पीक नष्ट हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

अंकिसा : येथून ८ की.मी. अंतरावर असलेले सोमनपल्ली नाल्याच्या पुलावरून मागील चार दिवसांपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे पातागुडम, कोपेला, कोरला व रायगुडम इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे.  जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे. साेमनपल्ली नाल्यामुळे पावसाळ्यात पलीकडच्या गावांचा अनेक वेळा संपर्क तुटत असल्याने उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे. मेडीगड्डा बॅरेजचे दरवाजे उघडल्याने गाेदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. माेटला टेकडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर