शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

तहानलेल्या पिकांना पावसाने केले तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:30 IST

गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले.

ठळक मुद्देदोन दिवस हजेरी : शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत टांगणीला लागलेला शेतकºयांचा जीव भांड्यात पडला आहे.जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या धानाला सध्या पावसाची गरज होती. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीएवढा पाऊस झाला असला तरी गेल्या १५ ते २० दिवसांत पावसाने हजेरीच न लावल्याने धान पीक सुकण्याच्या मार्गावर होते. पाऊस न आल्यास धान योग्य प्रकारे भरणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. याशिवाय इतर पिकही संकटात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी वरुणराजाने दया दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ३२.३ मिमी पाऊस झाला. त्यात चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासात जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.गुरूवारी रात्री बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४० पैकी ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात सर्वाधिक चामोर्शी ९३ मिमी, कुनघाडा ७१ मिमी, येनापूर ७३.८ मिमी, आष्टीत ७१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी १३५४ मिमी आहे. आतापर्यंत १३०९ मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण ९६ टक्के आहे. लवकरच वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे.इंजिन व कृषीपंप थांबलेप्रतीक्षा करूनही पाऊस होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी इंजिन व कृषीपंपांच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र आता इंजिन व कृषीपंप बंद झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस