शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

तहानलेल्या पिकांना पावसाने केले तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:30 IST

गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले.

ठळक मुद्देदोन दिवस हजेरी : शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत टांगणीला लागलेला शेतकºयांचा जीव भांड्यात पडला आहे.जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या धानाला सध्या पावसाची गरज होती. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीएवढा पाऊस झाला असला तरी गेल्या १५ ते २० दिवसांत पावसाने हजेरीच न लावल्याने धान पीक सुकण्याच्या मार्गावर होते. पाऊस न आल्यास धान योग्य प्रकारे भरणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. याशिवाय इतर पिकही संकटात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी वरुणराजाने दया दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ३२.३ मिमी पाऊस झाला. त्यात चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासात जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.गुरूवारी रात्री बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४० पैकी ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात सर्वाधिक चामोर्शी ९३ मिमी, कुनघाडा ७१ मिमी, येनापूर ७३.८ मिमी, आष्टीत ७१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी १३५४ मिमी आहे. आतापर्यंत १३०९ मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण ९६ टक्के आहे. लवकरच वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे.इंजिन व कृषीपंप थांबलेप्रतीक्षा करूनही पाऊस होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी इंजिन व कृषीपंपांच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र आता इंजिन व कृषीपंप बंद झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस