शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
4
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
5
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
6
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
7
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
8
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
9
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
10
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
11
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
12
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
13
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
14
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
15
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
16
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
17
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
18
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
19
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
20
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली

पावसाने रबीची पेरणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देवावरांमध्ये साचले पाणी : लागवडीसाठी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून अधूनमधून परतीचा पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे.जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची पेरणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करतात. पेरणी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे. पेरणीचे काम सुरू करण्याची तयारी सुरू असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने वावरांमध्ये पाणी साचले आहे. जोपर्यंत पाणी आटणार नाही, तोपर्यंत पेरणी करणे अशक्य असल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत पेरणीच्या कामांना सुरूवात झाली नाही.निसवलेले धान पावसामुळे कोसळले. तसेच हलक्या धानाच्या कडपांमध्ये पाणी साचल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रबी पिकातून थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच परतीच्या पावसाने रबीचीही पेरणी लांबविली आहे. रबीची पिके जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहतात. यातील काही पिकांना सिंचनाची गरज राहत नाही. मात्र जमिनीमध्ये ओलावा टिकून असणे आवश्यक आहे. पेरणी लांबल्यास पीक परिपक्व होण्यास विलंब होते. जमिनीतील ओलावा निघून गेल्यास पीक परिपक्व होण्यापूर्वीच करपण्याची शक्यता अधिक राहते. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमान वाढत असल्याने पीक परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे.अनेक दिवस राहणार ओलावाआॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा पुढील एक महिना कायम राहणार आहे. जमिनीत ओलावा राहल्याने पिकांची वाढ जोमाने होते. मात्र पेरण्या लांबल्याने पीक परिपक्व होण्याचा कालावधी सुद्धा वाढतो. परिणामी जानेवारी महिन्यात पुन्हा पावसाची गरज भासते. पाऊस न झाल्यास पिकांवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता राहते. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत.मिरचीची लागवड थांबलीसिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. मिरचीची लागवड करण्यासाठी शेतकºयांनी शेत नांगरून, वखरून तयार केले आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे मिरचीची लागवड लांबणीवर पडली आहे. जमीन वाळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. आसरअल्ली, अंकिसाचा परिसर ज्वारी, मका व मिरची पिकासाठी प्रसिद्ध मानला जातो. या भागात झालेल्या उत्पादनाची नजीकच्या तेलंगणा राज्यात विक्री केली जाते. गोदावरी, प्राणहिता नदीवर पूल झाले असल्याने बहुतांश शेतकरी सिरोंचा तालुक्यातील भाजीपाला स्वत: तेलंगणा राज्यात जाऊन विक्री करतात. यातून बºयापैकी उत्पन्न मिळण्यास मदत होते.

टॅग्स :agricultureशेती