शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

पावसाने रबीची पेरणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देवावरांमध्ये साचले पाणी : लागवडीसाठी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून अधूनमधून परतीचा पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे.जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची पेरणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करतात. पेरणी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे. पेरणीचे काम सुरू करण्याची तयारी सुरू असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने वावरांमध्ये पाणी साचले आहे. जोपर्यंत पाणी आटणार नाही, तोपर्यंत पेरणी करणे अशक्य असल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत पेरणीच्या कामांना सुरूवात झाली नाही.निसवलेले धान पावसामुळे कोसळले. तसेच हलक्या धानाच्या कडपांमध्ये पाणी साचल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रबी पिकातून थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच परतीच्या पावसाने रबीचीही पेरणी लांबविली आहे. रबीची पिके जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहतात. यातील काही पिकांना सिंचनाची गरज राहत नाही. मात्र जमिनीमध्ये ओलावा टिकून असणे आवश्यक आहे. पेरणी लांबल्यास पीक परिपक्व होण्यास विलंब होते. जमिनीतील ओलावा निघून गेल्यास पीक परिपक्व होण्यापूर्वीच करपण्याची शक्यता अधिक राहते. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमान वाढत असल्याने पीक परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे.अनेक दिवस राहणार ओलावाआॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा पुढील एक महिना कायम राहणार आहे. जमिनीत ओलावा राहल्याने पिकांची वाढ जोमाने होते. मात्र पेरण्या लांबल्याने पीक परिपक्व होण्याचा कालावधी सुद्धा वाढतो. परिणामी जानेवारी महिन्यात पुन्हा पावसाची गरज भासते. पाऊस न झाल्यास पिकांवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता राहते. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत.मिरचीची लागवड थांबलीसिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. मिरचीची लागवड करण्यासाठी शेतकºयांनी शेत नांगरून, वखरून तयार केले आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे मिरचीची लागवड लांबणीवर पडली आहे. जमीन वाळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. आसरअल्ली, अंकिसाचा परिसर ज्वारी, मका व मिरची पिकासाठी प्रसिद्ध मानला जातो. या भागात झालेल्या उत्पादनाची नजीकच्या तेलंगणा राज्यात विक्री केली जाते. गोदावरी, प्राणहिता नदीवर पूल झाले असल्याने बहुतांश शेतकरी सिरोंचा तालुक्यातील भाजीपाला स्वत: तेलंगणा राज्यात जाऊन विक्री करतात. यातून बºयापैकी उत्पन्न मिळण्यास मदत होते.

टॅग्स :agricultureशेती