शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पावसाचा मिरचीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला ...

ठळक मुद्देदरावर होणार परिणाम : सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. तोडणी करून वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची पावसात भिजल्याने मिरची काळवंडल्याने दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, बालमुत्यमपल्ली, आसरअल्लीसह परिसरात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या परिसरातून नदी वाहत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदून त्या माध्यमातून शेतीला पाणी देतात. सध्या या भागात मिरची, कापूस, ज्वारी, मका आदी पिके उभी आहेत. यापैकी अनेक शेतकºयांनी मिरचीची तोडणी करून ती वाळू घातलेली आहे. मिरची तीन ते चार टप्प्यात तोडली जाते. सध्या मिरची तोडणीचा दुसरा व तिसरा टप्पा सुरू आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची भिजली. काही शेतकºयांना पावसाची चाहूल लागताच त्यांनी मिरचीचे ढीग तयार केले. तरीसुद्धा पावसात मिरची भिजली. त्यामुळे मिरचीला बुरशी चढून ती काळवंडण्याची शक्यता आहे.एकदा जर मिरची काळवंडली तर तिला अत्यल्प दर मिळतो. परिणामी शेतकºयांचे नुकसान होणार आहे. याशिवाय या भागात कापसाची अंतिम तोडणीही झालेली नाही. पावसाने कापूस भिजून त्यालाही अत्यल्प दर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी उन्हाळी धानाची लागवड केली असल्याने काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फायदा या पिकाला झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस