शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पावसाचा मिरचीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला ...

ठळक मुद्देदरावर होणार परिणाम : सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. तोडणी करून वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची पावसात भिजल्याने मिरची काळवंडल्याने दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, बालमुत्यमपल्ली, आसरअल्लीसह परिसरात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या परिसरातून नदी वाहत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदून त्या माध्यमातून शेतीला पाणी देतात. सध्या या भागात मिरची, कापूस, ज्वारी, मका आदी पिके उभी आहेत. यापैकी अनेक शेतकºयांनी मिरचीची तोडणी करून ती वाळू घातलेली आहे. मिरची तीन ते चार टप्प्यात तोडली जाते. सध्या मिरची तोडणीचा दुसरा व तिसरा टप्पा सुरू आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची भिजली. काही शेतकºयांना पावसाची चाहूल लागताच त्यांनी मिरचीचे ढीग तयार केले. तरीसुद्धा पावसात मिरची भिजली. त्यामुळे मिरचीला बुरशी चढून ती काळवंडण्याची शक्यता आहे.एकदा जर मिरची काळवंडली तर तिला अत्यल्प दर मिळतो. परिणामी शेतकºयांचे नुकसान होणार आहे. याशिवाय या भागात कापसाची अंतिम तोडणीही झालेली नाही. पावसाने कापूस भिजून त्यालाही अत्यल्प दर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी उन्हाळी धानाची लागवड केली असल्याने काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फायदा या पिकाला झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस