शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

रेगडी-कसनसूर मार्ग दुरवस्थेत

By admin | Updated: February 1, 2015 22:57 IST

चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे

घोट : चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना येथून वाहतूक करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने छत्तीसगडमार्गे नेहमीच वाहतूक असते. त्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहने या मार्गाने ये- जा करीत असतात. मार्गावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर भाग संवेदनशील असल्याने या परिसरात अनेक कंत्राटदार रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी धजावत नाही. परिणामी अनेक लहान-मोठ्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. परिणामी अनेक नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करावी लागत आहे. रेगडी- कसनसूर हा मार्ग प्रमुख असल्याने या रस्त्याने झुरी, हेटेवाही, कसनसूर, रेगडी, कोंदेवाही, गरंजी, विकासपल्ली येथील नागरिक नियमित ये-जा करतात. येथील गावांसाठी रेगडी येथे प्रमुख बाजारपेठ असल्याने तसेच विकासपल्ली येथे धार भरडाईची व्यवस्था असल्याने येथे परिसरातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. रस्त्याची दुर्दशा आहेच शिवाय पुलालगत मोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे दुरूस्ती करण्याची मागणी आहे.