शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

रेगडी-कसनसूर मार्ग दुरवस्थेत

By admin | Updated: February 1, 2015 22:57 IST

चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे

घोट : चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना येथून वाहतूक करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने छत्तीसगडमार्गे नेहमीच वाहतूक असते. त्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहने या मार्गाने ये- जा करीत असतात. मार्गावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर भाग संवेदनशील असल्याने या परिसरात अनेक कंत्राटदार रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी धजावत नाही. परिणामी अनेक लहान-मोठ्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. परिणामी अनेक नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करावी लागत आहे. रेगडी- कसनसूर हा मार्ग प्रमुख असल्याने या रस्त्याने झुरी, हेटेवाही, कसनसूर, रेगडी, कोंदेवाही, गरंजी, विकासपल्ली येथील नागरिक नियमित ये-जा करतात. येथील गावांसाठी रेगडी येथे प्रमुख बाजारपेठ असल्याने तसेच विकासपल्ली येथे धार भरडाईची व्यवस्था असल्याने येथे परिसरातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. रस्त्याची दुर्दशा आहेच शिवाय पुलालगत मोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे दुरूस्ती करण्याची मागणी आहे.